
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ७५१ लघू प्रकल्पांपैकी ४३ व ७५ मध्यमपैकी ३ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. दुसरीकडे बीड व धाराशिवमधील प्रत्येकी एक मिळून दोन लघू प्रकल्प आताच कोरडे पडले आहेत.
मराठवाड्यातील ७५१ लघू प्रकल्पांपैकी प्रत्यक्ष पंचावन्न लघू प्रकल्पांतील पाणीसाठा आणि ३० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील २२, जालन्यातील १३, बीडमधील, ३६ लातूरमधील, १० धाराशिव मधील ४७, नांदेडमधील १३, परभणी व हिंगोलीतील पाच प्रकल्पांचा समावेश आहे. केवळ ९३ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ५५, धाराशिवमधील २०, जालन्यातील ५, बीड-लातूरमधील आठ व नांदेड-परभणीतील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे. जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या मध्यम तीन प्रकल्पांत धाराशिवमधील दोन व जालन्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीनही जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन व लातूरमधील एक मिळून सात मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
पाणीसाठा ६० टक्क्यांवर
मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ६० टक्क्यांवर आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक संख्येने असलेल्या ७५१ मध्ये प्रकल्पांतील पाणीसाठा सर्वांत कमी ३७.१३ टक्केच शिल्लक आहे. त्या पाठोपाठ ७५ माध्यम प्रकल्पांत ५३.०७ टक्के, ११ मोठ्या प्रकल्पांत ७०.६० टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात २६.२७ टक्के, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांमध्ये ८९.४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
६ जिल्ह्यांतील लघू प्रकल्पांतील पाणीसाठा
४० टक्क्यांच्या आत
मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ३७ टक्क्यांवर आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी व हिंगोली या सहा जिल्ह्यांतील उपयुक्त पाणीसाठा ४० टक्यांच्या आत आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ लघू प्रकल्पांत ३६ टक्के, जालन्यातील ५७ प्रकल्प ३४ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ३७ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पांत २७ टक्के, परभणीतील २२ प्रकल्पांत ३५ टक्के, हिंगोलीतील २७ प्रकल्पांत २८ टक्के, लातूरमधील १३५ प्रकल्पांत ५२ टक्के तर नांदेडमधील ८० प्रकल्पांत ४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
जालन्यातील सात मध्यम प्रकल्प ४० टक्क्यांवर
जालना जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ४० टक्क्यांवर आला आहे. त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमधील १६ मध्यम प्रकल्पांत ४७ टक्के, लातूरमधील अठरा प्रकल्पांत ५१ टक्के, परभणीमधील दोन प्रकल्पांचा ५६ टक्के, धाराशिवमधील १७ प्रकल्पांत ५७ टक्के, बीडमधील सोळा प्रकल्पांत ५८ टक्के, नांदेडमधील नऊ प्रकल्पांत ५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.