
Satara News : सातारा जिल्ह्यात मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असले तरी धरणांत गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा झाला आहे. जुलै महिन्यात सर्व प्रमुख धरणांत ७५ टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे.
सध्या कोयना, कण्हेर, तारळी धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के अधिक पाणीसाठा या वर्षी झाला आहे. सध्या पावसाची विश्रांती दिली असल्याने शेतीची कामे वेगाने सुरू आहेत.
मे, जूनमध्ये झालेल्या पावसामुळे मशागत, पेरणीची कामांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र हा पाऊस धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास उपयुक्त ठरलेला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ३० ते ३५ टक्के अधिक पाणीसाठा झाला आहे. सध्या पाऊस बंद झाला असून, दमदार पाऊस झाल्यास आठ ते दहा दिवस धरणे पूर्ण क्षमतेने भरणार आहेत. वीज निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना २४६२, नवजा २४५९, महाबळेश्वर २४८८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. कोयना धरणात मंगळवारी सकाळी आठपर्यंत ७६.२९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या धरणातही पाण्याची आवक जास्त झाली आहे.
प्रमुख धरणांतील पाणीसाठा
कोयना ७६.२९, धोम १०.८२, धोम-बलकवडी २.८२, कण्हेर ८.१२, उरमोडी, ७.७०, तारळी ४.९२.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.