
Washim News : पोकरा प्रकल्पातील गावांना दिशा देण्याच्या कामात सरपंचांची भूमिका महत्वाची आहे, असे मत यवतमाळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी व्यक्त केले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा -२ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि दिग्रस तालुक्यांतील सरपंचाचे दोन दिवसीय प्रशिक्षण येथे केव्हीकेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले. यावेळी उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून श्री. डाबरे बोलत होते.
ते पुढे म्हणाले, की जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ राबविण्यामागचे कारण व परिस्थितीचा उलगडा करीत हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीला चांगले दिवस देईल अशी अपेक्षा केली. यवतमाळ जिल्ह्याकरीता प्रकल्प कशाप्रकारे फायद्याचा ठरू शकतो, याबाबत उकल केली.
कृषियांत्रिकीकरण, पीक पद्धतीत बदल, समूह पद्धतीने फळबाग लागवड, नैसर्गिक व सेंद्रिय शेती, तसेच जमीन आरोग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या वेळी केव्हीकेचे नोडल अधिकारी डॉ. एस. के. देशमुख, लाहोरा खुर्द गावचे सरपंच सुदाम चिरंगे, फुलवाडी गावाच्या सरपंच विमल राठोड, प्रशिक्षक अशोक पवार, महेश ढवळे व सत्र समन्वयक अर्चना जतकर, राजेंद्र कोठुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात सत्र समन्वयक अर्चना जतकर यांनी हवामान बदलाचे परिणाम व पोकरा प्रकल्पाचे महत्व विषद करून सरपंचांचे प्रशिक्षण या प्रकल्पाचा महत्वाचा विषय असल्याचे सुचवले.
निवासी प्रशिक्षणात हवामान बदलास जुळवून घेणारा गावचा आराखडा, ग्राम कृषी विकास समिती, शेती संलग्न जोडधंदे, हवामान बदल आणि शेतीवारील परिणाम व नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन या घटकावर विशेष प्रकाश टाकण्यात येणार आहे. सूत्रसंचालन सत्र सहाय्यक अभिषेक देशमुख यांनी केले, तर आभार अशोक पवार यांनी मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.