Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Slaughter of Trees Highway : महामार्गाच्या कडेला वृक्षांची लागवड होणार कधी अशी विचारणा वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमींतून होत आहे.
Sankeshwar Banda Highway
Sankeshwar Banda Highwayagrowon

Tree Cutting Highway : संकेश्वर-बांदा महामार्ग उभारणीसाठी संकेश्वरपासून आंबोलीपर्यंत अनेक झाडांचा बळी गेला. या मार्गावरील झाडे तोडली. आजरा - गडहिंग्लजमधील या मार्गावरील सुमारे १५०० झाडे तुटल्याचा आकडा शासन दरबारी असला तरी प्रत्यक्ष वस्तुस्थिती मात्र वेगळी दर्शवते. किती झाडे तोडली असतील हे या मार्गावरून प्रवास करताना जाणवते. महामार्गाच्या कडेला वृक्षांची लागवड होणार कधी अशी विचारणा वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमींतून होत आहे.

आजरा-गडहिंग्लज व आजरा-आंबोली महामार्गावरील डेरेदार वटवृक्ष हे या मार्गाचे वैभव होते. महामार्ग बांधणीत तोडली. त्यामुळे हा रस्ता भकास झाला आहे. प्राधिकरणाने या मार्गाच्या कडेला झाडे लावण्याचे नियोजन आखल्याचे समजते. पण यंदाच्या पावसाळ्यात वृक्षांची लागवड होण्याची गरज आहे.

महामार्गावरील सिमेंटच्या रस्त्यालगत कच्चा रस्ता आहे. त्यानंतर गटर्स बांधली असून त्याच्या आधारासाठी मातीचा भराव टाकला आहे. त्याला लागून शेतकऱ्यांच्या खासगी जमिनी आहेत. त्यामुळे या मार्गावर झाडे लावणार कुठे असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Sankeshwar Banda Highway
Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

शासनाचा दिव्याखाली अंधार !

एकीकडे शासन म्हणते झाडे लावा झाडे जगवा. आजऱ्याच्या तहसीलदार कार्यालयाजवळ असलेला एक फलक तर बोलका आहे. सध्या हा फलक पुसटसा झाला असला तरी त्यावर लिहलेली सूचना कुणासाठी होती हा मात्र विनोदच आहे. एक झाडं वर्षाला काय देते? असे झाडाचे महत्त्‍व विशद केले होते. पण रस्ता बांधकामात अडथळा नसलेले डेरेदार फणसाचे झाडे तोडले गेले. त्यामुळे शासनाचा दिव्याखाली अंधारच म्हणावा लागेल.

खासगी क्षेत्रातही तोड वाढली

या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. उष्णताही वाढली आहे. असे असूनही तालुक्यात झाडांची तोड कमी झालेली नाही. चोरट्या वृक्षतोडीबरोबर खासगी क्षेत्रातही स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची मोठी तोड होत आहे. शासनाकडून प्रतिबंध असणाऱ्या दुर्मिळ वृक्षांची तोड होताना पाहून यांना कोण परवानगी देत आहे. याबाबत वृक्षप्रेमींतून विचारणा होत आहे.

या महार्गाचे बांधकाम करताना सुमारे १५०० झाडे तुटल्याचे बोलले जाते. या झाडाच्या दहापट झाडे महामार्गाच्या कडेने लावणार असल्याचे प्राधिकरण सांगते. या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यापुर्वी काम संपणार असल्याचे दिसते. त्यामुळे प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वी झाडे लावण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. स्थानिक प्रजातीची वड, पिंपळ, उंबर, कांचन, आंबा, चिंच यासारखी झाडे लावावीत.

- प्रा. अनिल मगर, पर्यावरणतज्ज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com