
New Delhi News: शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांना विकता यावा यासाठी सरकार एका मॉडेलवर काम करत असल्याचे कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रविवारी (ता. २६) सांगितले. ज्यामुळे मध्यस्थांची भूमिका कमी होईल असेही ते म्हणाले.
नवी दिल्लीतील पुसा कॅम्पसमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर सुमारे ४०० शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.ते पुढे बोलताना म्हणाले, की ‘शेती ते ग्राहक’ या मॉडेलमुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळण्यास मदत होईल. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे.
शेतकऱ्यांशिवाय भारताची प्रगती होऊ शकत नाही. शेती हा राज्याचा विषय असला तरी केंद्र सरकार शेतकऱ्यांना सर्वंकष मदत करेल, असेही चौहान यांनी नमूद केले. ते म्हणाले, की भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांचे योगदान मोलाची भूमिका असते. यासाठी केंद्रासह राज्य सरकारे तुम्हाला मदत करतील, असे ते शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले.
किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) पिकांची खरेदी करणे, तांत्रिक उपायांना चालना देणे, कृषी विज्ञान केंद्रांचे बळकटीकरण, नैसर्गिक शेती आणि पीक विविधतेला प्रोत्साहन देणे यांसह चालू असलेल्या प्रयत्नांवरही त्यांनी प्रकाश टाकला.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असेही कृषिमंत्री चौहान यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.