
Nagpur News: पतंजली फूड पार्कच्या माध्यमातून विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्रा बागायतदारांचे हित जपले जाणार आहे. या प्रकल्पातून दर दिवशी सुमारे ८०० टन संत्र्यावर प्रक्रिया होईल. त्यापासून ज्यूस, पल्प तसेच संत्र्याच्या सालीपासून सौदर्य प्रसाधने तयार केली जाणार आहेत.
त्यामुळे लहान आकाराच्या संत्रा फळांना बाजारपेठ मिळाल्याने उच्च दर्जाच्या फळांचे चांगले दर शेतकऱ्यांना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास पतंजली उद्योग समूहाचे संचालक आचार्य बालकृष्णन यांनी दिली.
पतंजली समूहाद्वारे नागपूरच्या मिहान परिसरात सुमारे २३३ एकरांवर पतंजली फूड पार्कची उभारणी करण्यात आली आहे. आज (ता.९) या प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या क्षमतेविषयी माहिती देण्याकरिता शुक्रवारी (ता.७) आयोजित पत्रकार परिषदेत बालकृष्णन बोलत होते.
ते म्हणाले, की विदर्भाच्या विकासाकरिता सहकार्य करा, अशी साद तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ वर्षांपर्वूी घातली होती. त्याला प्रतिसाद देत बाबा रामदेव यांनी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे मान्य केले. त्यानंतर आठ वर्षांपूर्वी प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. परंतु नागपुरी संत्र्यावर प्रक्रिया करण्यात अनेक अडचणी आहेत. या बाबींची दक्षता घेत जागतिकस्तरावर संत्र्याचे मूल्यवर्धन संदर्भात इतर काय करता येते याची तांत्रिकदृष्ट्या चाचपणी करण्यात आली. त्यानुसार सालीपासून सौदर्य प्रसाधने तयार केले जाणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.