Farmers Issue : राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली

Agriculture Crisis : राज्यात महायुतीचे सरकार येऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. हे सरकार सर्व बाबतींत अपयशी ठरले आहे. सरकारच्या कारभाराबाबत शेतकरी, सर्वसामान्य जनतेची घोर फसवणूक केली आहे.
Agriculture Issue
Farmers Issue Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : राज्यात महायुतीचे सरकार येऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. हे सरकार सर्व बाबतींत अपयशी ठरले आहे. सरकारच्या कारभाराबाबत शेतकरी, सर्वसामान्य जनतेची घोर फसवणूक केली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना न्याय देण्यासाठी संभाजी ब्रिगेड राज्य सरकारच्या विरोधात मैदानात उतरणार असल्याचा निर्णय संभाजी ब्रिगेडच्या बैठकीत घेण्यात आला.

अहिल्यानगर येथे संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शेतकरी, कष्टकरी कामगाराच्या प्रश्‍नावर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बैठक झाली. निरिक्षक कमिटीचे सदस्य व प्रदेश संघटक डॉ. बालाजी जाधव, अतुल गायकवाड, रमेश गायकवाड, राज्याचे उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश इथापे, जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे उपस्थित होते.

Agriculture Issue
Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

राज्यात सरकार येऊन जवळपास सहा महिने उलटले आहे. परंतु अद्यापही शेतकरी, विद्यार्थी, महिला, व्यापारी आदीचे प्रश्‍न ‘जैसे थे’ आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न शासनाने तातडीने सोडवावेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सह विविध घटना वर्गांमध्ये यांनी विचार करून विनाय द्यावा आधी सह इतर बाबीवर संभाजी ब्रिगेड आक्रमक भूमिका घेत सर्वसामान्यांच्या प्रश्‍नावर संभाजी ब्रिगेडने आक्रमक आंदोलने करुन अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Agriculture Issue
Maharashtra Farmer Issue: शेतकऱ्यांवर खर्च करायला काय अडचण?

यापुढे संभाजी ब्रिगेड गरीब सामान्य जनतेच्या प्रश्‍नावर अत्यंत तीव्र आंदोलने करणार असल्याचे सांगण्यात आले. प्रदेश संघटक डॉ. बालाजी जाधव, अतुल गायकवाड, रमेश गायकवाड, राज्याचे उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश इथापे, जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, ब्रिगेडच्या महिलाध्यक्षा राजेश्री शिंदे यांनी यावेळी आपली भूमिका मांडली.

स्थानिक स्वराज्य संस्था लढणार

राज्यात आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. राज्य सरकार शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र सरकार फसवणूक करत आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार पूर्ण ताकदीने लढवून सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com