Jayakwadi Water Issue : हक्काचे पाणी सोडा, अन्यथा पश्‍चिम महाराष्ट्रात जाणारा ऊस रोखू

Marathwada Water Crisis : पश्‍चिम महाराष्ट्रातील नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडविण्यात आलेले आहे. आदेश देऊनही जायकवाडीत पाणी सोडण्यात येत नाही.
Water Issue
Water IssueAgrowon
Published on
Updated on

Jalna News : पश्‍चिम महाराष्ट्रातील नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडविण्यात आलेले आहे. आदेश देऊनही जायकवाडीत पाणी सोडण्यात येत नाही. या विरोधात समृद्धी साखर कारखान्याचे अध्यक्ष सतीश घाटगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत पश्‍चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यात मराठवाड्यातून जाणारा ऊस रोखण्याचा इशारा दिला आहे.

तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात पाण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेला ही सतीश घाटगे पाटील आव्हान देणार आहेत. समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणानुसार मराठवाड्याच्या हक्काचे ८.६०८ टीएमसी पाणी आदेश देऊनही सोडण्यात आलेले नाही. पश्‍चिम महाराष्ट्रातील नगर, नाशिक भागातील नेत्यांच्या दबावामुळे हे पाणी अडविण्यात आलेले आहे.

Water Issue
Jaykwadi Water Issue : जायकवाडीसाठी पाणी सुटणार केव्हा?

तसेच मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याला विरोध करत पश्‍चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या विरोधात समृद्धी कारखान्याचे अध्यक्ष सतीश घाटगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ११ नोव्हेंबर रोजी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेकडो शेतकऱ्यांनी जनआंदोलन केले.

Water Issue
Jaykwadi Water Issue : जायकवाडीत त्वरित पाणी नाही सोडल्यास उग्र आंदोलन

त्यानंतरही सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याने शनिवारी सतीश घाटगे यांनी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच सरकारला पाणी सोडण्यास भाग पाडण्यासाठी आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना धडा शिकविण्यासाठी मराठवाड्यातून पश्‍चिम महाराष्ट्रात जाणारा १२ लाख मेट्रिक टन ऊस रोखण्याचा इशारा सतीश घाटगे यांनी दिला आहे.

प्रत्येक वेळी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी भांडून घ्यावे लागत आहे. परंतु आता यापुढे अशी वेळ मराठवाड्यातील जनतेवर येऊ नये, म्हणून हक्काच्या पाण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला आव्हान देणार आहे. सरकारने मराठवाड्याच्या पाण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, सध्या मराठवाडा दुष्काळी परिस्थितीतून जात आहे. शेती आणि पिण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे.
- सतीश घाटगे पाटील, अध्यक्ष, समृद्धी साखर कारखाना, जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com