
Shriwardhan News: डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान आंबा झाडांना मोहर येण्यास सुरुवात झाली होती. अनुकूल वातावरणामुळे श्रीवर्धन तालुक्यात साधारण एप्रिल ते मेपर्यंत फळ काढणीसाठी योग्य होईल, असा विश्वास आंबा बागायतदारांना होता. परंतु काही दिवसांपासून आंब्याला पुनर्पालवी फुटून मोहर आल्याने देठातून फळगळतीला सुरुवात झाली आहे. परिणामी आंबा उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
श्रीवर्धन तालुक्यात आंबा पिकाचे उत्पादनक्षम क्षेत्रफळ १,९१० हेक्टर इतके आहे. या मध्ये ९० टक्के हापूस तर त्या खालोखाल पायरी व केसर आंब्याची लागवड बागायतदारांनी केली आहे. डोंगरउताराच्या तसेच वरकस जमीन आंबा पिकासाठी योग्य आहेत. पोषक हवामान व झाडांची निगा यावर मोहोर अवलंबून असतो.
योग्य वातावरणामुळे नोव्हेंबरअखेरीस मोहर येण्यास सुरुवात झाल्याने बागायतदारांकडून या वर्षी साधारण चार हजार टन आंबा उत्पादनाची अपेक्षा वर्तविली जात होती, परंतु अचानक फळगळतीला सुरुवात झाल्याने उत्पादन घटण्याची चिंता बागायतदारांना सतावत आहे. काही झाडांना आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात यंदा फळधारणा झाली व सर्व फळांना पोसण्याची क्षमता झाडांमध्ये नसल्याने अनेक ठिकाणी फळगळ झाली आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी पुनर्पालवीमुळे फळ काढणी जूनपर्यंत लांबणार आहे. पावसाळी दिवसात आंब्याला योग्य भाव मिळत नसल्याने बागायतदार काळजीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.