Crop Insurance Delay: विमा कंपनीकडे थकला १०० कोटींचा परतावा

Farmer Rights: खरीप हंगाम २०२४ मध्ये अतिवृष्टीनंतर विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी कंपनीकडे भरपाईसाठी दावे दाखल केले होते. या घटकांअंतर्गत मंजूर ९० कोटी तसेच उत्पादन आधारित नुकसान भरपाई घटकांअंतर्गत १० कोटी असे एकूण १०० कोटींचा परतावा अद्याप विमा कंपनीकडे थकला आहे.
Crop Insurance Delay
Crop Insurance DelayAgrowon
Published on
Updated on

Nanded News: खरीप हंगाम २०२४ मध्ये अतिवृष्टीनंतर विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी कंपनीकडे भरपाईसाठी दावे दाखल केले होते. या घटकांअंतर्गत मंजूर ९० कोटी तसेच उत्पादन आधारित नुकसान भरपाई घटकांअंतर्गत १० कोटी असे एकूण १०० कोटींचा परतावा अद्याप विमा कंपनीकडे थकला आहे.

कृषी विभाग, जिल्हा प्रशासन मात्र शेतकऱ्यांना त्वरित विमा परतावा मिळावा, यासाठी प्रयत्नशील असलेतरी कंपनीच्या आकडेमोडीमुळे शेतकऱ्यांना विमा परताव्यापासून वंचित राहावे लागत आहे.खरीप हंगाम २०२४ मधील सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मुग व ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Crop Insurance Delay
Crop Insurance Delayed: विमा हप्ता थकल्याने भरपाई मिळेना

याबाबत भरपाई मिळावी, यासाठी सहा लाख ३८ हजार अर्ज दाखल केले होते. यापैकी ३० टक्के सॅम्पल सर्वेनुसार विमाधारकांना (विस्तृत स्थानिक नैसर्गिक आपत्ती) ४१ कोटी ६५ लाखांचा विमा परतावा मंजूर झाला आहे. तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकानुसार १०० कोटी व उत्पादन आधारित नुकसान भरपाई या घटकानुसार १० कोटी परतावा मंजूर झाला आहे.

Crop Insurance Delay
Crop Insurance Delay: राज्य सरकारकडून १९१ कोटींचा विमा हिस्सा थकीत; शेतकऱ्यांच्या परताव्याला विलंब

यात खरिपातील याबाबत विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी सहा लाख ३८ हजार दावे दाखल केले होते. परंतु या कालावधीत झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे न करता केवळ तीस टक्के सॅम्पल सर्वे करण्यात आले. यानुसार जिल्ह्यातील सहा लाख ३८ हजार अर्जदार शेतकऱ्यांना केवळ ४१ कोटी ६५ लाखांचा परतावा मिळाला. दरम्यान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील अतिवृष्टीनंतर जिल्ह्यात पुन्हा पावसाने थैमान घातले.

यानंतर विमाधारक एक लाख पाच हजार अर्जदार शेतकऱ्यांनी दावे दाखल केले. यामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांअंतर्गत शंभर कोटींचा विमा मंजूर झाल्याची माहिती मिळाली. परंतु यानंतर विमा कंपनीच्या पोर्टलवर केलेल्या आकडेमोडीमुळे आता ८९ कोटी विमा मंजूर झाल्याचे सांगितले जात आहे. 

या घटकांअंतर्गत १० कोटींचा विमा कमी होत आहे. तसेच उत्पादन आधारित नुकसान भरपाई या घटकांअंतर्गत शेतकऱ्यांना १० कोटी ८५ लाखांचा विमा परतावा मंजूर झाला आहे. असा एकूण १०० कोटींचा परतावा प्रलंबित आहे. 

१४० कोटींचा विमा परतावा मंजूर 

जिल्ह्यात विस्तृत स्थानिक नैसर्गिक आपत्ती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती व उत्पादन आधारित नुकसान भरपाई या तीन घटकानुसार १४० कोटींचा विमा परतावा मंजूर झाला आहे. तर यापूर्वी मध्य हंगामातील नुकसान भरपाई (मीड सीझन ॲडव्हर्सिटी) या घटकांअंतर्गत २५८ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com