Maharashtra Revenue Recovery : अमळनेर विभागाची विक्रमी १३९ टक्के वसुली

Revenue Department Of Maharashtra : गेल्या २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात ‘प्रपत्र अ’मध्ये २.७० कोटी व ‘प्रपत्र ब’मध्ये ५.१८ कोटी असे एकूण ७.८८ कोटी रुपये वसूल करून ७०.०४ टक्के उद्दिष्ट साध्य केले होते.
Revenue Department
Revenue DepartmentAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : महसूल विभागाने २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे १३९.२६ टक्के महसूल कर वसूल केला आहे. गेल्या काही वर्षातील वसुलीचा हा उच्चांक आहे. वसुलीत अमळनेरचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आला आहे. ‘प्रपत्र-अ’मध्ये जमीन महसूल, बिन शेतीसारा व नजराणा आदी प्रकारच्या रकमेतून करवसुली होत असते, तर ‘प्रपत्र- ब’मध्ये गौणखनिज दंड, करवसुली आदी प्रकारची वसुली होत असते.

गेल्या २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात ‘प्रपत्र अ’मध्ये २.७० कोटी व ‘प्रपत्र ब’मध्ये ५.१८ कोटी असे एकूण ७.८८ कोटी रुपये वसूल करून ७०.०४ टक्के उद्दिष्ट साध्य केले होते. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ‘प्रपत्र अ’मध्ये १.६२ कोटी रुपये, प्रपत्र बमध्ये ३.९० कोटी रुपये असे एकूण ५.५२ कोटी रुपये वसूल करून ६७.७३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले होते.

Revenue Department
Revenue Department Reforms : विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महसूल सुधारणांसाठी समित्या

२०२३-२४मध्ये प्रपत्र अमध्ये ३.७३ कोटी रुपये व प्रपत्र बमध्ये ५.९८ कोटी रुपये असे एकूण ९.७१ कोटी रुपये वसूल करून १०३.७४ टक्के उद्दिष्ट साध्य केले. मात्र, २०२४-२५ या आर्थिक वर्षात विक्रमी वसुली केली आहे.

प्रपत्र अमध्ये ३.५७ कोटी रुपये, तर प्रपत्र बमध्ये ९.५९ कोटी रुपये असे एकूण १३.७१ कोटी रुपये वसूल केले. चालू आर्थिक वर्षात १३९.२६ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, मंडळाधिकारी, तलाठी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Revenue Department
Maharashtra Revenue Department : दलालांच्या लॉबी मोडीत काढा

बिन शेतसाराचे १५ कोटी रुपये थकीत

नागरिक रिकामा प्लॉट घेऊन ठेवतात. त्यानंतर तेथे काही वर्षांनी घर बांधले जाते. प्लॉटचे रूपांतर घरात झाल्याने ते सिटी सर्व्हेकडे वर्ग होते. नागरिक महसूल कर भरणे बंद करतात. प्रत्यक्षात मात्र, सिटी सर्व्हे विभागाने असेसमेंट करून बिनशेतीसारा प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवायला पाहिजे.

तेथून नागरिकांकडे बिनशेतीसारा यादी तलाठ्यांकडे येते व तलाठी तो वसूल करतात. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून ही प्रक्रिया राबविली गेलीच नाही. त्यामुळे नागरिकांना याबाबत काहीच माहिती नाही, असा बिनशेतीसारा म्हणून सुमारे १५ कोटी रुपये अंदाजित थकबाकी नागरिकांकडे असल्याची माहिती तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com