Nandurbar News : राज्याच्या अनेक भागात यंदा अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसला आहे. यामुळे हजारो हेक्टरच्या शेतीचे नुकसान झाले आहे. तर अनेकांना मोबदला अजूनही मिळालेला नाही. कांद्याचे भाव ही गडगडत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. दरम्यान नंदुरबार बाजार समितीतही शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. येथे मिरचीची विक्रमी आवक झाली आहे. ज्यामुळे योग्य दर मिळत नसल्याचे समोर आले आहे.
देशातील मिरचीची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नंदुरबार (Nandurbar) कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. येथील समितीमध्ये मिरचीची विक्रमी आवक पहायला मिळते. आताही येथे अवकाळी पावसाच्या संकटानंतर मिरचीची विक्रमी आवक झाली आहे. येथे २ लाख क्विंटल मिरचीची आवक झाली आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा २ लाख क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. ज्यामुळे याचा थेट परिणाम मिरचीच्या दरावर होताना दिसत आहे. आवक झालेल्या मिरचीला योग्य बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एक लाख क्विंटल हून अधिक मिरचीची आवक झाली होती. तेव्हा समितीत मिरची खरेदीचा एक लाख क्विंटलचा टप्पा पार पडला होता. तर त्यावेळी लाल मिरचीचे दर ४ हजारांपासून ते ६००० रुपयांदरम्यान होते.
दरम्यान वाहतूक संघटनेच्या संपामुळे कोल्हापूर बाजार समितीत वाहतूक अडवण्यात आली होती. ज्यामुळे येथे काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी हस्तक्षेप करून गोंधळ कमी केला.
तसेच कांदा-बटाटा नाशवंत असल्याने त्याची वाहतूक रोखता येणार नाही असेही पोलीस निरीक्षकांनी सांगितले. त्यानंतर येथील कांदा-बटाट्याची वाहतूक सुरळीत झाली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.