
Islamabad News: ‘‘जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तटस्थ चौकशीस तयार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी शनिवारी सांगितले. मात्र शांततेला आमचे प्राधान्य असले तरी तो आमचा कमकुवतपणा समजू नये,’’ अशी धमकीही भारताला उद्देशून दिल्याचे ‘डॉन’ या पाकिस्तानी दैनिकातील वृत्तात म्हटले आहे.
योग्य पुराव्याशिवायच निराधार व खोटे आरोप करण्याची भारताची सवय कायम असल्याचा आरोप त्यांनी भारतावर केल्याचे ‘डॉन’मधील वृत्तात म्हटले आहे. पहलगामजवळील बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या या क्रूर हल्ल्यानंतर भारताकडून सिंधू पाणी करार स्थगित करण्याबरोबच अन्य चार कठोर निर्णय घेण्यात आले.
या हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या सरकारकडून पहिल्यांदाच प्रस्ताव देण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची तटस्थ, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीसाठी आम्ही तयार आहोत, असे शरीफ म्हणाले. अबोटाबादजवळील काकुल येथील पाकिस्तानी सैन्यदल अकादमीच्या दीक्षान्त सोहळ्यात ते म्हणाले, ‘‘पहलगाममधील अलीकडच्या काळात घडलेली दुर्घटना ही या सततच्या दोषारोपाच्या खेळाचे आणखी एक उदाहरण आहे जी आता थांबली पाहिजे.
जबाबदार देशाची भूमिका पार पाडताना पाकिस्तान कोणत्याही तटस्थ, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत भाग घेण्यास तयार आहे. पाकिस्तानने नेहमीच सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करीत आला आहे.’’
शरीफ म्हणाले, की पाणी हे पाकिस्तानचे महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे, आपली जीवनरेखा आहे. कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध पाणी सुरक्षित ठेवले जाईल यात शंका नाही. म्हणूनच, सिंधू पाणी करारांतर्गत पाकिस्तानच्या पाण्याचा प्रवाह रोखण्याचा, कमी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल.
‘जर पाणी थांबवले तर नद्यांमध्ये रक्त वाहील’
इस्लामाबाद : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी कराराला स्थगिती दिल्याने पाकिस्तानचे नेते व माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांनी ‘जर पाणी थांबवले तर नद्यांमध्ये रक्त वाहील,’ अशी धमकी भारताला दिली आहे. सिंध प्रांतातील सुक्कुर भागात एका सार्वजनिक सभेत शुक्रवारी भाषण करताना ते म्हणाले,
‘‘ सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहील.एकतर आमचे पाणी त्यातून वाहील किंवा त्यांचे रक्त. भारत हा हजारो वर्षे जुन्या संस्कृतीचा वारस असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे, पण ती संस्कृती लरकाना येथील मोहेंजोदडो येथील आहे. आम्ही तिचे खरे संरक्षक आहोत आणि आम्ही तिचे रक्षण करू. सिंध आणि सिंधूच्या लोकांमधील युगानुयुगाचे जुने नाते मोदी तोडू शकत नाहीत.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.