Raju Shetti : राज्यात दुष्काळाची भीषण स्थिती पीक कर्ज माफी द्या, राजू शेट्टी आक्रमक

Maharashtra Drought : राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सह इतर बहुतांश जिल्ह्यात चारा पाण्याची कमतरता आहे.
Raju Shetti
Raju Shettiagrowon

Maharashtra Drought Condition : राज्यात दुष्काळाची स्थिती भीषण असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली. पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांची भेट घेऊन दुष्काळाच्या तीव्रतेची परिस्थिती दाहकता समोर मांडून यावर ठोस उपाययोजना करण्याची त्यांनी मागणी केली.

तसेच शक्तीपीठ महामार्गावरील जमिनी लुटण्याचे सरकारचे कारस्थान आम्ही हाणून पाडू, हा महामार्ग तातडीने मागे घ्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला.

शेट्टी पुढे म्हणाले, यंदा राज्यात भीषण दुष्काळ परिस्थिती असताना देखील राज्य सरकारद्वारे कोणत्याही ठोस उपाय योजना करताना दिसत नसून दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे होरपळून गेला आहे. आचारसंहितेचा बागुलबुवा दाखवून प्रशासन उपाययोजना करण्यास टाळाटाळ करत आहे. जनावरे पाण्याविना तडफडत आहे.

राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सह इतर बहुतांश जिल्ह्यात चारा पाण्याची कमतरता होत असतांना देखील यंदा राज्य सरकारद्वारे एकही चारा छावणी उभी केली नाही. एका बाजूला दुष्काळाने घेरले असताना काही भागात अवकाळीमुळे उरली सुरली हाताशी आलेली पिके, फळे, बागा उद्ध्वस्त झालेली असल्याने याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

राज्यात खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना पीक कर्ज वाटप नियोजन प्रश्नी प्रशासन उदासिन दिसत आहे तसेच पाण्याचे योग्य नियोजन न राखल्याने ग्रामीण भागात गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला असून ग्रामीण जनजीवन अक्षरशः पूर्ण उध्वस्त होण्याच्या अवस्थेत असताना सरकार कडून अत्यंत तुटपुंजी उपाययोजना केली जात आहे.

Raju Shetti
Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

दुष्काळमुळे राज्यातील शेतकरी पार मेटाकुटीला आलेला असून त्याच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना कर्ज वसुलीसाठी बँका वित्त पुरवठादार संस्था तगादा लावत आहे. राज्यात त्वरीत दुष्काळ जाहीर करत सर्व प्रथम शेतकऱ्याकडून करण्यात येणाऱ्या पीक कर्ज वसुलीस ताबडतोब स्थगिती देत ज्या ज्या महसूल क्षेत्रात दुष्काळ तीव्रता सर्वाधिक आहे त्या ठिकाणी पीक कर्ज माफी घोषीत करावी लागणार आहे.

अवकाळीग्रस्त नुकसान भरपाई झालेल्या सर्व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देऊन राज्यात अद्यापही शासनाद्वारे चारा छावण्या सुरु करण्यात आलेल्या नाहीत, मागणी येईल त्या गावात विना विलंब चारा छावणी सुरु करण्यात यावेत. पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरुप धारण करत असल्याने ज्या ज्या गावांत मागणी येईल त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टैंकर त्वरीत उपलब्ध करुन मिळण्यासाठी सरकारने तातडीने लक्ष घालावे. अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com