
MSP Demand: खनौरी आणि शंभू सीमेवर मागील वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या पंजाबमधील शेकडो शेतकऱ्यांना अटक केली आहे. तर शेतकरी नेते जगजितसिंह डल्लेवाल आणि सरवनसिंग पंढेर यांनी पंजाब पोलिसांनी बुधवारी रात्री (ता.१९) ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे केंद्रीय कृषिमंत्री आणि शेतकरी नेत्यांच्या बैठकीनंतर काही तासात पंजाब पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
या बैठकीनंतर शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी नेत्यांशी सकारत्मक चर्चा झाली असून पुढील बैठक ४ मे रोजी आयोजित करण्यात आल्याचंही सांगितलं होतं. चंडीगडच्या महात्मा गांधी इनस्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनीस्ट्रेशन सेक्टर २६ मध्ये आयोजित या बैठकी केंद्रीय कृषिमंत्र्यांसह ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयलही उपस्थित होते.
हमीभाव कायद्याच्या ग्यारंटीसह विविध मागण्यांसाठी २०२४ च्या फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी खानौरी आणि शंभू सीमेवर आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे वर्षभरानंतर केंद्र सरकारने आंदोलक शेतकऱ्यांची दखल घेऊ शेतकरी नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे.
केंद्र सरकारचे प्रतिनिधि मंडळ आणि शेतकरी नेत्यांची पहिली बैठक १४ फेब्रुवारी रोजी झाली. तर दुसरी बैठक २२ फेब्रुवारी रोजी झाली होती. त्यावेळी तिसरी बैठकी १९ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. १९ मार्च रोजी तिसरी बैठक पार पडली. परंतु त्यानंतर काही वेळातच खनौरी आणि शंभू सीमेवरील शेकडो आंदोलक शेतकऱ्यांना पंजाब पोलिसांनी अटक केली.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. तसेच खनौरी सीमेच्या आजूबाजूच्या भागासह संगरूर आणि पटियाला जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी शंभू सीमेवर शेतकऱ्यांनी लावलेले तंबू तोडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शेतकऱ्यांनाही सीमेवरून हटवले जात असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून जोरदार टिका केली जात आहे.
या प्रकरणावर पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस खासदार चरणजीत सिंग चन्नी यांनी म्हटले, "शेतकऱ्यांवर डाव आखून हल्ला केला जात आहे. फक्त पंजाबच नाही तर संपूर्ण शेतकरी आज मोठ्या हल्ल्याचा सामना करत आहे. एक बैठक झाली ज्यात ठरले की पुढील चर्चा ४ मे रोजी होईल, पण त्यांच्यावर मागून हल्ला केला गेला आणि त्यांना फसवले गेले. रस्ता सरकारने रोखला आहे, शेतकऱ्यांनी नाही. ते दिल्लीला येऊ इच्छित होते." असंही चन्नी म्हणाले.
तसेच संयुक्त किसान मोर्चाने या कारवाईवरून पंजाबमधील आप सरकारवर आरोप केले आहेत. पंजाबमधील आप सरकार केंद्र सरकारसोबत हातमिळवणी करून काम करत असल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला. तर कॉँग्रेससह शिरोमणी अकाली दल यांनी पोलिस कारवाईवरून टिका केली आहे. तसेच शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी अटक केलेल्या शेतकऱ्यांना सोडलं नाही तर देशभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पंजाब पोलिसांनी मात्र कार्यवाही दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधला असून कोणत्याही प्रकारची बळजबरी केली नाही, असं सांगितलं आहे. तसेच हरियाणा पोलिसही लवकरच कार्यावही सुरू करेल. यामध्ये काही शेतकऱ्यांनी घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्या शेतकऱ्यांना बसमध्ये घरी सोडण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.