Agriculture Crisis: पावसाचा खंड, पिकांच्या मुळावर

Monsoon Rain Delay Issue: पावसाची मोठी तूट असलेल्या मराठवाडा, अहिल्यानगर, खानदेश, विदर्भातील तालुक्यांत पिके माना टाकत आहेत. वाढीच्या अवस्थेतील पिकांना पाण्याचा ताण बसला आहे, तर काही ठिकाणी कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे.
Kharif Crop Issue
Kharif Crop IssueAgowon
Published on
Updated on

Pune News: पावसाची मोठी तूट असलेल्या मराठवाडा, अहिल्यानगर, खानदेश, विदर्भातील तालुक्यांत पिके माना टाकत आहेत. वाढीच्या अवस्थेतील पिकांना पाण्याचा ताण बसला आहे, तर काही ठिकाणी कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहिल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

बहुतांश भागांत जेमतेम पावसाच्या भरवशावर आजपर्यंतची पिके तगली, मात्र पुढे काय, असा प्रश्‍न पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांपुढे आहे.अनेक भागांत पावसाने तब्बल २० ते २२ दिवसांचा खंड दिल्याने सोयाबीन, कपाशी, मक्यासह सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. पिकाच्या वाढीच्या अवस्थेतच ही परिस्थिती उद्‍भवल्याने त्याचा उत्पादकतेवर परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Kharif Crop Issue
Paddy Crop : पावसाच्या दडीमुळे भात पीक संकटात

पश्‍चिम विदर्भात जून, जुलैमध्ये पावसाने अपेक्षित प्रमाण न गाठल्यामुळे खरीप हंगामावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये पावसाचा फटका अधिक जाणवत आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्यात तूर, मूग, उडीद पिकास पोषक वातावरण असले तरी, पावसाचा खंड होताच. त्यामुळे या पिकांनाही काही अंशी फटका बसला असल्याचे चित्र आहे.

Kharif Crop Issue
Crop In Crisis : पावसाच्या उघडिपीमुळे पिकांनी टाकल्या माना

मराठवाठा तहानलेलाच

छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यांत पावसाचा कमी-अधिक प्रमाणात खंड पाहायला मिळाला. त्यामुळे पावसाळ्याचे निम्मे दिवस संपले असतानाही अनेक भागातील पाणीसाठे तहानलेलेच आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा खंड पडला आहे. मे महिन्यात लवकर झालेल्या पावसामुळे कर्जत, जामखेड, श्रीगोंदा भागांत पेरणी झालेल्या मूग, उडदाच्या पिकांवर परिणाम झाला आहे.

पिकाची परिस्थिती जेमतेम आहे. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर १५ दिवसांपूर्वी पाऊस आला. दोन-तीन दिवस रिमझिम पाऊस आला. औषधाचे आणि मजुरीचे दर खूप वाढले आहेत. त्या तुलनेत शेतीमालाला दर नाहीत. पीकविम्याचे ट्रिगर कमी केल्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त पीकविमा भरलेला नाही. शेतकऱ्यापुढे संकट निर्माण झाले आहे.
रावसाहेब जाधव, जामखेड, ता. अंबड, जि. जालना
माझ्याकडे आठ एकर शेती असून यातील चार एकरांवर धान लागवड होते. यंदा समाधानकारक पाऊस होईल या शक्‍यतेने महिनाभरापूर्वी पऱ्हे (धान रोप) टाकले. आता १० ते १५ दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने रोवणीचे काम थांबले आहे. रोवणी लांबल्यास उत्पादकतेवर परिणाम होणार आहे.
शालीक झाडे, वायगाव भोयर, ता. वरोरा, चंद्रपूर
आमच्या तालुक्यात जून व जुलै महिन्यांत कमी पाऊस झाला. विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. तालुक्याचा दौरा करून पीक पाहणी केली. उशिरा पेरणी केलेल्या पिकांची वाढ मात्र खुंटली आहे.
पांडुरंग निरस, तालुका कृषी अधिकारी, गंगाखेड, जि. परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com