
Pune News: आंबेगाव - शिरूर विधानसभा मतदारसंघातील वेळ, घोड नदी व भीमा खोऱ्याचा भूशास्त्रीय अभ्यास करून पाणलोट क्षेत्र विकासाला गती द्यावी. त्यासाठीआदिवासी भाग, मध्य ,पूर्व भाग व पाबळ परिसर असे चार विभाग करावेत. पावसाचे पडणारे पाणी शिवारात आडले व मुरले पाहिजे. शेतीला शाश्वत पाणी मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने येत्या पाच वर्षाचा अभ्यासपूर्णआराखडा तयार करावा, अशा सूचना माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. २५) जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतीला शाश्वत पाणी मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना या संदर्भात वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता सुजाता हांडे, हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, डॉ. सुमंत पांडे, डॉ. संजय पाटील, डॉ, एस. एम. पडघमकर, गौरव बोरकर यांच्यासह शास्त्रज्ञ व अधिकारी उपस्थित होते.
डॉ. पांडे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून सद्यःस्थितीत शाश्वत पाणी उपलब्ध होण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.
यावेळी जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, की आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाला शाश्वत पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी गावनिहाय माहिती संकलित करा. या कामासाठी अटल भूजल ,कृषी विभाग नरेगा जलसंधारण व जिल्हा नियोजन समिती यामधून निधी दिला जाईल. मे महिन्यात दर्जेदार कामे झाली पाहिजेत. त्यादृष्टीने गतिमान पद्धतीने संबंधित सर्व यंत्रणांनी काम करावे.’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.