
Sindhudurg News : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून भातरोपांची पुनर्लागवड सुरू असून आतापर्यंत १५ हजार हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे. जुलै अखेरपर्यंत भातरोपांची पुनर्लागवड पूर्ण होईल, असा अंदाज आहे. दरम्यान या वर्षी ५७ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर भातपीक लागवडीचे उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यात या वर्षी मे महिन्यापासून पाऊस सुरू झाल्यामुळे भात रोपवाटिकांची कामे शेतकऱ्यांच्या नियोजनानुसार झाली नाहीत. तीन टप्प्यांत होणाऱ्या भात रोपवाटिका दोन टप्प्यांत झाल्या. जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात अधिकत्तर रोपवाटिका तयार झाल्या.
या वर्षी ५ हजार ७०० हेक्टरवर रोपवाटिकांचे उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात ५ हजार ४०० हेक्टरवरच भात रोपवाटिका झाल्या आहेत. त्यामुळे २० जूननंतर भातरोप पुनर्लागवडीला प्रारंभ झाला.
सुरुवातीला खुप धिम्या गतीने रोप पुनर्लागवडीचे काम सुरू झाले. परंतु गेले काही दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने भातरोप पुनर्लागवडीला गती आली. आतापर्यंत जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर भातरोप पुनर्लागवड पूर्ण झाली आहे.
काही तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक लागवड झाली आहे. वैभववाडी, कणकवली, देवगड तालुक्यांत भातरोप पुनर्लागवड १५ ते २० जुलैपर्यत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला तालुक्यांत ३१ जुलैपर्यंत लागवड पूर्ण होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.