
Sindhudurg News : पहिल्या टप्प्यात तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकांमधील भातरोप लागवडी योग्य झाली असून त्या भातरोपांच्या पुनर्लागवडीला सुरुवात झाली आहे. या वर्षी पाऊस लवकर होऊनदेखील रोप लागवडीला विलंबाने सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात यावर्षी ५५ हजार हेक्टरवर भातपीक लागवडीचे उद्दिष्ट आहे. यावर्षी अवकाळी पाऊस मे च्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला. त्यानतंर सतत २४ मे पर्यंत मॉन्सूनपूर्व पावसाचा धडाका सुरू होता. २५ मे रोजी मॉन्सून दाखल झाला.
शेतकऱ्यांनी कोणतीही पूर्वतयारी केलेली नसताना पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे पाऊस पडताच भात रोपवाटिकांची कामे हाती घेणाऱ्या शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडून गेले. शेतकऱ्यांना पाऊस थांबण्याची वाट पाहावी लागली.
दरवर्षी १५ ते २० मे या कालावधीत होणाऱ्या धूळवाफा पेरण्या झाल्याच नाहीत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर पहिल्या टप्प्यातील भात रोपवाटिकांची कामे सुरू झाली. या रोपवाटिकांमधील भातरोपे आता लागवडीयोग्य झाली आहेत.
साधारणपणे १५ ते १६ दिवसांनी रोपे लागवडीयोग्य होतात. परंतु यावर्षी दोन-तीन दिवसांचा कालावधी अधिक लागत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील भातरोप पुनर्लागवडीला आता शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.
सध्या जिल्ह्यात ३ ते ४ टक्के शेतकऱ्यांनी भातरोप पुनर्लागवडीला सुरुवात केली आहे. परंतु पुढील चार ते पाच दिवसांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी पुनर्लागवडीला सुरुवात करण्याचा अंदाज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.