
Amaravati News : यंदा संत्रा फुटीच्या काळातच तापमानात वाढ होण्यास प्रारंभ झाल्याने आंबिया बहाराच्या संत्रा उत्पादनावर परिणाम झाला आहे. तापमानाने उच्चांक गाठल्याने गळतीचे प्रमाण वाढले आहे.
संत्रा नुकसानीच्या विमा परताव्याचा तापमानवाढीचा निकष लागू होत असला तरी तो महसूल मंडलनिहाय तापमान व सलग तीन दिवस ४५ अंशांचे तापमान असल्याने संत्रा उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही समस्या अतिवृष्टीप्रमाणे मोजण्याची मागणी होऊ लागली आहे.
अमरावती जिल्ह्यात संत्रा फळपिकाखाली ८२ हजार ३८७ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी आंबिया बहरात अंदाजे ६६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. फेब्रुवारी-मार्च हा या बहारातील संत्रा फळाच्या फुटीचा काळ असून यंदा याच कालावधीत तापमान ४० अंशांपर्यंत गेले. त्याचा थेट परिणाम फुटीवर झाला असल्याने सद्यःस्थितीत एकूण उत्पादनाच्या तीस ते चाळीस टक्के संत्रा शिल्लक आहे, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
संत्रा बागांसाठी पाणी महत्त्वाचे असून तापमानवाढीने भूगर्भातील पाणी पातळीवरही परिणाम झाला आहे. जलपातळी कमालीची घसरली असल्याने बागांना आवश्यक पाणीपुरवठा करणे अशक्य होऊ लागल्याने ताण बसू लागला आहे, असे निरीक्षण आहे.
नियमित वीजपुरवठा नसल्याने व मिळत असलेली वीज दुपारच्या सत्रात मिळत असल्यानेही पुरेसे पाणी देणे कठीण झाल्याची व्यथा संत्रा उत्पादकांनी व्यक्त केली. संत्रा फळगळ ही नैसर्गीक आपत्ती म्हणून मोजल्या जात नसल्याने संत्रा उत्पादकाना अतिवृष्टीने होणाऱ्या पिकांच्या नुकसानभरपाई प्रमाणे अर्थसाह्य मिळत नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.