Water Stock : पुणे जिल्ह्यातील धरणांत अवघा सोळा टीएमसी पाणीसाठा

Water Shortage : जून महिना सुरू झाला असताना जिल्ह्यात उन्हाच्या झळा कमी अधिक होत आहेत. धरणातील पाणीसाठा मात्र वेगाने कमी होत आहे.
Water Stock
Water Stock Agrowon

Pune News : जून महिना सुरू झाला असताना जिल्ह्यात उन्हाच्या झळा कमी अधिक होत आहेत. धरणातील पाणीसाठा मात्र वेगाने कमी होत आहे. सध्या जिल्ह्यातील २६ धरणे मिळून अवघा १६.४६ टीएमसी म्हणजेच अवघे आठ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.२६ टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. जूनमध्ये वेळेवर पाऊस न झाल्यास पाणीटंचाईत वाढ होण्याची शक्यता आहे, असे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगामात वाढलेल्या उन्हाच्या झळा यामुळे धरणांतील पाण्याची मागणी होती. त्यातच रब्बी हंगामात जिल्ह्यातील काही धरणांतून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांतही पाण्याचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.

Water Stock
Pune Water Shortage : पुणे जिल्ह्यात मे अखेरीस पाणीटंचाई तीव्र

सध्या खडकवासला, वीर, येडगाव, डिंभे, या धरणांतून उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही कालव्यांना उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने कमी होत असून, धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी धरणांत २३.७२ टीएमसी म्हणजेच १९.९६ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी आवर्तनाद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने धरणांत पाणीसाठा कमी राहिला आहे.

सध्या मुठा खोऱ्यातील खडकवासला साखळी धरणातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांत अवघा ४.६९ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. खडकवासला धरणातून डाव्या कालव्याला २५४ क्युसेक, तर उजव्या कालव्याला १००५ क्युसेकने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. याशिवाय पुणे शहरालाही पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Water Stock
Water Shortage : राज्यातील दोन कोटी पशुधन तहानलेले

नीरा खोऱ्यातील पवना, कळमोडी, कासारसाई, भामा आसखेड, आंध्रा, वडीवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणांत अवघा ४.७३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी भाटघर धरणांतून नदीला १७०५ क्युसेक, वीर धरणांतून उजव्या कालव्याला १००३ क्युसेकने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.

कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड धरणांत १.५९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी येडगाव धरणातून डाव्या कालव्याला १४०० क्युसेक, तर डिंभे धरणांतून डाव्या कालव्याला ५०० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. तर उजनीचा पाणीसाठा उणे ३२.११ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com