
Solapur News : सुरत-चेन्नई महामार्गासाठी कामासाठी मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथील चार शेतकऱ्यांचा तीन एकर गहू जमीनदोस्त करून सुरू करण्यात आलेले काम सुरूच आहे. बाधित शेतकरी हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून अत्यल्प भूधारक आहेत. यामुळे ते न्यायलयात जाऊ शकले नाहीत.
मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथील चार शेतकऱ्यांच्या तीन एकर गव्हाचे पीक जमीनदोस्त करून सुरू करण्यात आलेल्या महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणने थांबविलेले नाही.
ज्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून रस्ता करण्यात आला ते शेतकरी हे अत्यल्पभूधारक शेतकरी आहेत. यापैकी शरणबसप्पा भुती यांना पावणेतीन एकर क्षेत्र आहे. त्यातील सव्वाएकर क्षेत्र या महामार्गासाठी संपादित करण्यात आले आहे.
तर दुसरे शेतकरी सूर्यकांत हिरतोट यांना फक्त ६८ गुंटे जमीन आहे. त्यापैकी १९ गुंटे जमीन संपादित करण्यात आली आहे. बाधितांपैकी सर्वच शेतकरी घरची शेती करून रोजंदारीचे काम करून उदरनिर्वाह करतात. न्यायालयात दाद मागण्यासाठी जाऊ शकले नाहीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.