
Jalgaon News : मागील महिन्यात पावसाने निराश केले. कमी पावसाने सिंचन प्रकल्पदेखील भरलेले नाहीत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सिंचन प्रकल्पांतील जलसाठा स्थिती चिंताजनक आहे. यंदा केवळ तापी नदीवरील हतनूर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
खानदेशातील विविध सिंचन प्रकल्पांतील पाण्याची आवक बंद आहे. यामुळे कुठेही पाण्यचा विसर्ग सुरू नाही. मागील वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जळगावातील मंगरूळ, सुकी, अभोडा, तोंडापूर, बोरी आदी सिंचन प्रकल्पांतून विसर्ग सुरू झाला होता. तसेच अन्य सिंचन प्रकल्प भरण्याच्या स्थितीत होते.
पण यंदा कमाल सिंचन प्रकल्प कोरडे, रिकामे दिसत आहेत. तापी नदीच्या उगम क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तापी नदीत पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे खानदेशातील तापी नदीवरील हतनूर (ता. भुसावळ), शेळगाव (ता. जळगाव) धुळ्यातील सुलवाडे (ता. शिरपूर), नंदुरबारमधील प्रकाशा व सारंगखेडा (ता. शहादा) या बॅरजमधून विसर्ग सुरू आहे. पण या प्रकल्पांतील आवकही कमी झाल्याने विसर्ग घटला आहे.
खानदेशात मागील आठवड्यात कुठेही पाऊस झालेला नाही. कडक ऊन पडत आहे. पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे. जळगावातील मन्याड, अग्नावती, अंजनी, तोंडापूर, वाघूर, बोरी या मध्यम प्रकल्पांतूनही विसर्ग सुरू नाही.
हे प्रकल्प कोरडे आहेत. खानदेशातील सर्वांत मोठ्या गिरणा नदीवरील चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणात पाण्याची आवक सुरू आहे. हे धरण ६६ टक्के भरले आहे. मागील वर्षी धरण १०० टक्के भरले होते.
नद्याही कोरड्या
सध्या धुळ्यातील जामखेली प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. तसेच शिरपूरमधील अनेर, नंदुरबारमध्ये सुसरी, चिरडे, दरा, देहली या प्रकल्पांतही पाण्याची आवक अल्प आहे. हे प्रकल्पदेखील भरलेले नाहीत. वाघूर, तापी, कांग, वाघूर, अंजनी, गिरणा, भोकर, सुकी आदी नद्या प्रवाही नाहीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.