
Jalgaon News : खानदेशात सर्वत्र चांगला पाऊस नाही. पण जमिनीत बागायती पिकांसाठी पुरेसा ओलावा अनेक भागात आहे. यामुळे भूगर्भातील पाणी उपसा, मागणी, वापर कमी झाला आहे. यामुळे सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात घट थांबली आहे.
जलसाठा उन्हाळ्यात सतत कमी होत गेला. गिरणा धरणातील जलसाठा जूनमध्ये २१ टक्केच होता. त्यात आता जलसाठा वाढला. , केळी, भाजीपाला, ऊस आदी पिकांच्या सिंचनाची कार्यवाही गतीने सुरू नाही. यामुळे पाण्याची गरज शिवारात कमी आहे. यामुळे भूगर्भातील पाणी उपसा कमी आहे.
शेतकरी शिवारात कापूस पिकात कुठलेही सिंचन नसल्याची स्थिती आहे. फक्त केळी, भाजीपाला, कलिंगड आदी पिकांत विद्रव्य खते देण्यासाठी दोन - पाच दिवसाआड कूपनलिका, विहिरींतून सिंचन केले जात आहे.
सध्या कूपनलिका, विहिरी व इतर कृत्रीम जलसाठ्यांमधून पिकांच्या सिंचनाची कार्यवाही फारशी नाही. यंदा जूनच्या सुरवातीपर्यंत पाणी उपसा, वापर गतीने होता. पाण्याची बचत करणे शक्य नव्हते. सतत हलका ते मध्यम, जोरदार पाऊस काही भागात जून व जुलैत झाल्याने सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ झाली आहे.
भूगर्भातील जलसाठाही यामुळे काही भागांत वाढला आहे. खानदेशातील एकूण जलसाठ्यासह भूगर्भातील जलसाठ्यात चांगली वाढ अपेक्षित आहे. कूपनलिका, विहिरी व इतर कृत्रीम जलसाठ्यांमधून पाण्याचा उपसा पुढे पाऊस वाढल्यास कमी होईल.
तापी नदीवरील हतनूर, वाघूर, गिरणा धरणांतून पाण्याची मागणी फक्त पिण्यासाठी आहे. तसेच केळीसह अन्य पिकांची लागवड वाढत असून, त्यासाठी पाण्याचा वापर काही भागांत होत आहे. पुढे पाण्याची मागणी कमी होईल. पण त्यासाठी चांगला पाऊस हवा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.