Agriculture Irrigation : निळवंडे कालव्यातून बुधवारपासून सुटणार पाणी

Nilwande Dam : भंडारदरा धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळ्याची तीन आणि रब्बीचे एक आवर्तन करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला आहे.
Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : भंडारदरा धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळ्याची तीन आणि रब्बीचे एक आवर्तन करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला आहे. निळवंडेच्या कालव्यातून १५ जानेवारीपासून पाणी सोडण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

लोणी (ता. राहाता) येथे भंडारदरा प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची शुक्रवारी (ता. १०) बैठक झाली. जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, आमदार हेमंत ओगले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, नाशिक विभाग मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Irrigation
Agriculture Irrigation : पाण्याअभावी बागायतीपासून ३३ गावे वंचित

भंडारदरा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्यातून सध्या सिंचन बिगर सिंचनाचे आवर्तन सुरू आहे. येणाऱ्या काळात २० फेब्रुवारी ते २४ मार्चमध्ये पुढचे आवर्तन करण्याचे नियोजन आहे. २४ मार्च ते ३० एप्रिलमध्ये दुसरे आवर्तन आणि शिल्लक पाण्यातून जूनमध्ये एक आवर्तन कसे होईल, याचेही नियोजन विभागाने केले आहे.

निळवंडे प्रकल्पात सहा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून कालव्यांना १५ जानेवारीपासून आवर्तन सोडण्याच्या सूचना त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या. या आवर्तनातून पाझर तलाव भरून देण्यात येतील.

Irrigation
Agriculture Irrigation Scheme : पंतप्रधान कृषी सिंचन पाणलोट योजनेचा बोजवारा

अतिक्रमणाच्या कारणाने चाऱ्यांच्या कामांना विलंब होत असून चाऱ्यांच्या भोवताली असलेले अतिक्रमण काढण्याचे काम तातडीने करण्यात यावे, अनेक ठिकाणी चाऱ्यांवर घरे, जनावारांचे गोठे बांधण्यात आले आहेत. नकाशाप्रमाणे त्यांची मोजणी करण्यात यावी. चाऱ्या किंवा कालवे यांच्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात यावे, यावर चर्चा झाली.

शेतकऱ्यांनी वेळेत पाणी मागणीचे अर्ज भरावेत, निळवंडे चाऱ्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ल करून देण्यात येणार असून ही काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्यात यावे, भविष्यात आपल्याकडे असलेल्या केटिवेअरचे रूपांतर बॅरेजमध्ये करून पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा विचार करावा लागेल. जिल्ह्यातील पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला असून पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळवितानाच भंडारदरात अतिरिक्त पाणीसाठा करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com