
Sindhudurg News: जिल्ह्यात सध्या पावसाच्या हलक्या सरी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन काजू कलम लागवडीला प्रारंभ केला आहे. हलक्या सरी सुरू असतानाचे वातावरण काजू कलम लागवडीला पोषक मानले जाते.
दरम्यान, सध्या वेंगुर्ला जातीच्या काजू कलमांची शासकीय रोपवाटिकेमध्ये ७०, तर खासगी रोपवाटिकांमध्ये ९० रुपयांनी विक्री सुरू आहे.जिल्ह्यात दर वर्षी साधारणपणे ५ हजार एकर क्षेत्रावर काजू लागवड केली जाते.
जिल्ह्यात सद्यःस्थितीत ७९ हजार हेक्टरवर काजू लागवड आहे. यातील ५९ हजार हेक्टरवरील काजू लागवड उत्पादनक्षम आहे. जिल्ह्यात दर वर्षी ५ हजार हेक्टरवर लागवड होत होती. परंतु मागील पाच-सहा वर्षांपासूनच त्यामध्ये घट होऊ लागली.
काजू बी चे पडलेले दर, बदलत्या वातावरणाचा परिणाम आणि किडरोगांचा वाढलेला प्रादुर्भाव अशा अनेक कारणांचा त्यामध्ये समावेश आहे. असे असले तरी काजू लागवड अजूनही अनेक शेतकरी करीत आहेत.
जिल्ह्यात यावर्षी पाच हजार एकर क्षेत्रांवर काजू लागवड होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, सध्या काजू लागवडीला प्रारंभ झाला आहे. काजू लागवडीकरिता पोषक वातावरण आहे. जिल्ह्यात सध्या ऊन पाऊस असे चित्र आहे.
हलक्या सरी पडत असल्यामुळे लागवडीला पोषक वातावरण आहे.त्यामुळे शेतकरी सध्या काजू लागवड करू लागले आहेत.वेंगुर्ला जातीच्या कलमांचीच अधिकतर निवड शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
शासकीय रोपवाटीकांमध्ये प्रतिरोप ७० रुपये दरांने विक्री केले जात आहे, तर खासगी रोपवाटीकांमध्ये ९० रुपयांनी विक्री केले जात आहे. वेंगुर्ला सात आणि चार जातीच्या कलमांना शेतकऱ्यांची पसंती दिसून येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.