
Ahilyanagar News: सरकार सत्तेवर येण्याआधी महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. मात्र शेतकऱ्यांपाठोपाठ सरकार ‘लाडक्या बहिणीं’चीही फसवणूक करत आहे. त्यामुळे सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, यासाठी श्रीरामपूर येथे शेतकरी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
सरकारकडून कर्जमाफी आणि महिलांना २१०० रुपये देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कर्जमाफीचे आश्वासन पाळले जात नसल्याने मागील आठवड्यात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा यासाठी पोलिसांत तक्रार दिली होती. आता दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथे महिलांनी तशीच तक्रार पोलिसांत दाखल केली.
महायुती सरकारने ‘लाडक्या बहिणीं’ची फसवणूक करून विश्वासघात केला. त्याविरुद्ध श्रीरामपूर पोलिस स्टेशन येथे महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार शेतकरी महिला सुनीता वानखेडे, कोमल वानखेडे यांनी दिली. कर्जदार शेतकरी नवनाथ दिघे, प्रकाश जाधव, श्रीराम त्रिवेदी यांनी देखील फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारी केल्या. अहिल्यानगरलाही बच्चू मोढवे यांनी तक्रार दिली.
श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यास शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील शेतकरी व ‘लाडक्या बहिणी’ ५ मे रोजी छत्रपती संभाजीनगरला उच्च न्यायालयात शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांच्यामार्फत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी याचिका दाखल करणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.