NCP Protest : राष्ट्रवादीचा जळगावमध्ये आक्रोश मोर्चा ; कापसाला १२ हजार रुपये देण्याची मागणी
Jalgaon News : राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडे मोडले आहे. तसे कापूस १२ हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने (शरद पवार गट) आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणि बैलगाडी रॅली काढून सरकारचे लक्ष वेधले.
अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कापूस, कांदा, केळी, हरभरा, गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करू अशा फक्त घोषणा न करता तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावी,दोन वर्षांपूर्वी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १२००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. यावर्षी तो अवघा ६५०० ते ७००० पर्यंत मिळत आहे. शासनाने हस्तक्षेप करून ५००० हजार रुपये तरी अनुदान म्हणून द्यावे. अशी मागणी करण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.