Rahul Gandhi Attacks Modi: नरेंद्र मोदी जनसंपर्काचा तमाशा बघण्यात मग्न

Farmer Issue India: महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (ता.३) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर शब्दांत टीका करत सरकारच्या कृषी धोरणांवर प्रश्‍न उपस्थित केले.
Rahul Gandhi
Rahul GandhiAgrowon
Published on
Updated on

Pune News: महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (ता.३) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर शब्दांत टीका करत सरकारच्या कृषी धोरणांवर प्रश्‍न उपस्थित केले. महाराष्ट्रातील शेकडो शेतकरी आत्महत्या करत असताना पंतप्रधान आपल्याच जनसंपर्काचा तमाशा बघण्यात मग्न आहेत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

यंदा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये विदर्भासह महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांचा संदर्भ देत श्री. गांधी यांनी ‘एक्स’वर मोदी सरकारवर टीकेची झोड उठवणारी पोस्ट केली.

Rahul Gandhi
Farmer Issue: जुगारामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

‘‘शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली बुडत असून व्यवस्था शेतकऱ्यांना शांतपणे पण अथकपणे मारत आहे. तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याच जनसंपर्काचा तमाशा पाहण्यात दंग आहेत.’’ असे श्री. गांधी म्हणाले.

‘‘कल्पना करा, फक्त तीन महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ही फक्त एक आकडेवारी आहे का? नाही. ही ७६७ उद्ध्वस्त घरे आहेत. ७६७ कुटुंबं जी कधीही सावरणार नाहीत. आणि सरकार? गप्प आहे. उदासीनतेने पाहत आहे,’’ असे श्री. गांधी यांनी नमूद केले.

Rahul Gandhi
Farmers Issue: तीन महिन्यांत राज्यात ६६७ शेतकरी आत्महत्या

चीनवरील अवलंबित्वाचा धोका

चिनी उत्पादनांवरील भारताच्या वाढत्या अवलंबित्वाबद्दल राहुल गांधी यांनी बुधवारी (ता. २) चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण आज तोच कणा परकीय अवलंबित्वाच्या ओझ्याखाली वाकत आहे. भारत ८० टक्के विशेष खतांची आयात चीनमधून करतो. आणि आता चीनने पुरवठ्यात हात आखडता घेतलाआहे.’’

‘‘खतांच्या टंचाईची ही पहिलीच वेळ नाही. शेतकरी आधीच युरिया आणि डीएपीसारख्या आवश्यक खतांच्या कमतरतेशी झुंजत असताना त्यात भर म्हणून आता हे ‘चिनी संकट’ ओढवलं आहे. परंतु पंतप्रधान मात्र खतांच्या पोत्यावर स्वतःचे छायाचित्र छापण्यात दंग आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र ‘मेड इन चायना’वर अधिकाधिक अवलंबून राहावे लागत आहे,’’ असे श्री. गांधी म्हणाले.

चीनकडून खतांचा पुरवठा कोणत्याही क्षणी खंडित होऊ शकतो, हे माहीत असूनही सरकारने त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी केली नाही, असा आरोप श्री. गांधी यांनी केला. ‘‘देशांतर्गत खत उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पण त्यासाठी सरकारकडे ना कोणते धोरण आहे ना योजना,’’ असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com