
१) ९–१० जून रोजी मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील ४,५०० हेक्टर केळी व फळबागांचे नुकसान झाले.
२) विमा कंपनीने तांत्रिक कारणांवरून नुकसानभरपाई नाकारली, काही निवडक मंडलांचेच नुकसान मान्य केले.
३) शेतकरी व स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वयंचलित हवामान केंद्रांच्या चुकीच्या नोंदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
४) सरकारी हालचाल: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तक्रारीची दखल घेत उच्चस्तरीय बैठक बोलावली.
५) तपासणीची मागणी: सर्व हवामान केंद्रांची तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून झाली.
Nanded News: जिल्ह्यात ९ व १० जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मुदखेड व अर्धापूर तालुक्यात केळीसह इतर फळबागा भुईसपाट झाल्या होत्या. परंतु विमा कंपनीने मात्र केळीचा पीक विमा नाकारल्याने बारड येथील प्रा. संदीपकुमार देशमुख यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी संपर्क साधला. याबाबत कृषी मंत्र्यांनी तक्रारीची दखल घेत कृषी मंत्रालयात ‘उच्चस्तरीय बैठक’ आयोजित केली आहे.
मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच वादळी वाऱ्यामुळे मुदखेड व अर्धापूर या भागातील केळी व इतर फळबागांचे चार हजार पाचशे हेक्टर वरील नुकसान झाले होते. त्यानंतर खासदार रवींद्र चव्हाण, खासदार अशोक चव्हाण, पालकमंत्री अतुल सावे यांनी दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला. या नुकसानी विषयी आमदार श्रीजया चव्हाण यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला.
परंतु संबंधित विमा कंपनीने मात्र तांत्रिक बाबी पुढे करून विमा नाकारला. ही बाब बारड भागातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख यांनी थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे मांडली. मंत्र्यांनी लगेख जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी चर्चा करून सर्व माहिती घेतली.
या विषयावर ते सर्व संबंधितांची बैठक घेणार आहेत. अर्धापूर, मुदखेड या तालुक्यांमधील केळीच्या बागा भुईसपाट होऊन देखील संबंधित विमा कंपनीने केवळ निवघा बा., पिंपरखेड, तळणी (ता. हदगाव) दिग्रस - शेवडी बा. (ता. कंधार -लोहा) आणि चांडोळा (ता. मुखेड) या मंडळांमध्ये झालेले नुकसान मान्य केले.
९ व १० जून रोजी मुदखेड व अर्धापूर तालुक्यात केळी बागांचे नुकसान होऊनही लगतच्या हदगाव तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वाऱ्याच्या वेगाची ताशी ६०-८० किलो मीटर अशी नोंद झाली.
परंतु अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्धापूर तालुक्यातील चेनापुर येथे वाऱ्याचा ताशी वेग ३८ किलोमीटर नोंदला गेला. अशाच प्रकारे मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील इतर मंडळातही वाऱ्याचा ताशी वेग कमी नोंदवला गेल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांनी स्वयंचलित हवामान केंद्राच्या तांत्रिक बाबीवर बोट ठेवले आहे.
१) मुदखेड व अर्धापूर तालुक्यात किती शेतीचे नुकसान झाले?
साधारण ४,५०० हेक्टर केळी व फळबागांचे नुकसान झाले.
२) विमा कंपनीने नुकसानभरपाई का नाकारली?
तांत्रिक कारणे आणि हवामान केंद्राच्या नोंदींवर आधारित कारणे देत दावा नाकारला.
३) शेतकऱ्यांचा मुख्य आरोप काय आहे?
स्वयंचलित हवामान केंद्र चुकीच्या ठिकाणी बसवून कमी वेगाची नोंद केली गेली, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
४) सरकारने या प्रकरणात काय पावले उचलली?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून उच्चस्तरीय बैठक बोलावली.
५) शेतकऱ्यांची पुढील मागणी काय आहे?
हवामान केंद्रांची तपासणी व जबाबदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.