Onion Export Ban : दादांनी त्यांचा दरारा केंद्रालाही दाखवावा...; कोल्हे यांचा अजित पवार यांना खोचक सल्ला

Amol Kolhe On Ajit Pawar : महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहे. याबाबत माहिती देताना खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक सल्ला दिला आहे.
Onion Export Ban
Onion Export BanAgrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. केद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. याची सुरुवात शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून होणार असून समारोप शनिवारी (ता. ३०) शरद पवार यांच्या विराट सभेने होणार आहे. दरम्यान अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. तसेच कोल्हे यांनी मंगळवार (२६ रोजी) अजित पवार यांना टोला लगावताना खोटच सल्ला देखील दिला आहे.

अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर गेल्या काही दिवसापासून टीका करणे सुरू केलं आहे. दरम्यान सोमवारी (२५ रोजी) अजित पवार यांनी थेट कोल्हे यांच्यावर निशाना साधला. तसेच येत्या लोकसभा निवडणूकीत आपण कोल्हे यांचा पराभव करू असे चॅलेंज दिले. त्यानंतर मंगळवार (२६ रोजी) कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांना शेतकरी आक्रोश मोर्चाची माहिती दिली. यादरम्यान कोल्हे यांनी अजित पवार यांनी खोचक सल्ला दिला आहे.

Onion Export Ban
Ajit Pawar : पुणेकरांची चिंता वाढली? अजित पवार यांनी दिले पाण्यावरून संकेत?

काय म्हणाले कोल्हे?

कोल्हे म्हणाले, 'दादांचे माझ्यावर असेच प्रेम असेल तर 'त्यांनी केंद्र सरकारकडे आग्रही आणि ठाम भूमिका घ्यावी. त्यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी करताना केंद्राला सांगावं की, आमचा कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. तात्काळ निर्याद बंदी उठवा'.

'दादांच्या कामाचा दरारा, दादांच्या आवाजाचा दरारा सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे दादांना केंद्र सरकारालाही तसाच दरारा दाखवावा. आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला अडणचीत आणणारी कांदा निर्यात बंदी उठवावी. अजित पवार यांच्याकडेच अर्थ खातं आहे, त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा', असे आवाहन कोल्हे यांनी अजित पवार यांना केले आहे.

Onion Export Ban
Ajit Pawar : पुणेकरांची चिंता वाढली? अजित पवार यांनी दिले पाण्यावरून संकेत?

अर्धे उपमुख्यमंत्री

'सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सहा मुद्दे घेऊन आम्ही मोर्चा काढत आहोत. गेल्या ९ वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळत नसल्याची टीका कोल्हे यांनी केली आहे. तसेच, 'ज्यावेळी ४० टक्के निर्यात शुल्क हे कांदा उत्पादकांवर लादण्यात आला. त्यावेळी आत्ताचे अर्धे उपमुख्यमंत्र्यांनी, २ लाख टन कांदा हा केंद्र सरकार २४१० रू दराने खरेदी करणार अशी घोषणा केली. त्यांनी याची माहिती घाई घाईत ट्विट करून दिली होती. 'माझे असे आव्हान आहे की २४१० रू भाव मिळालेला शेतकरी फडणवीस यांनी दाखवावा'.

'जेंव्हा कांद्याला चार पैसे मिळत होते, तेंव्हा भाव सरकारने पाडले. भाव घोषणा करून पाडले. आता ९ वर्षानंतर कांद्याला भाव मिळत असतानाच निर्याद बंदी घातली गेली आहे. ४५ चा कांदा थेट १५ रूपयांवर येतो, मग शेतकऱ्याने जगायचं कसं?' असा सवाल केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com