Crop Insurance : निम्म्याहून अधिक शेतकरी पीकविम्यापासून वंचित

Swabhimani Sanghtana Demand on Crop Insurance : शेतकऱ्यांना पैसे मिळाले, तर निम्म्याहून अधिक शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीकविम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Yeola News : अत्यल्प पावसामुळे खरिपातील पिके शेतातच करपली असून, प्रत्येक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे तालुक्यात दुष्काळी जाहीर झाला. मात्र, शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत.

तालुक्यात निम्म्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले, तर निम्म्याहून अधिक शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीकविम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

नैसर्गिक, अनैसर्गिक संकटांमुळे वर्षोगणती शेतकरी नुकसान सोसत असून, प्रत्येकवेळी त्याच्या पदरी निराशाच येत आहे. सातत्याने आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट झाली आहे. या स्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी व त्यांच्या पिकाला आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू करण्यात आली.

मात्र, योग्यवेळी व नुकसानाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळत नसल्याने, योजनेचा हेतू साध्य होताना दिसत नाही. हक्काची पीकविम्याची रक्कम मिळविण्यासाठी दरवर्षी शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात.

Crop Insurance
Banana Crop Insurance : ‘एमआरसॅक’मुळे साडेदहा हजार केळी उत्पादक विम्यापासून वंचित

या वर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतात उभे असलेले पिके करपल्याने शेतकरी उत्पन्नापासून वंचित राहिले. सुरुवातीला शासनाने शेतकऱ्याने पीकविमा काढावा,

यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून प्रोत्साहन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तालुक्यात निम्म्याहून अधिक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

Crop Insurance
Crop Insurance : विम्याच्या रकमेपासून शेतकरी अद्याप वंचित

शासनाने सरसकट सर्वच शेतकऱ्यांना विम्याच्या लाभ देऊन दुष्काळात आर्थिक आधार द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख मच्छिंद्र जाधव, तालुकाध्यक्ष दिगंबर दौंडे, उपाध्यक्ष विलास दरगुडे, उदय पाटील, विजय शिंदे, ज्ञानेश्वर वाघ, रघुनाथ काळे, शरद आव्हाटे, रामनाथ दौंडे, माणिक रसाळ, विनोद अहिरे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

एखादे वर्ष शेतकऱ्यांना परवडणार असते आणि इतर वेळेस पिकातून नुकसानच सहन करावे लागते. या वर्षी शेतात पिके करपल्याने उत्पन्न तर दूरच गुंतवलेले भांडवलही मिळालेले नाही. त्यामुळे शासनाने पीकविम्यासह कांदा अनुदान देऊन शेतकऱ्यांना आर्थिक आधार द्यावा.
मच्छिंद्र जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com