Pune News : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील पठारभाग असलेल्या शिरदाळे परिसरात पावसाळी बटाटा पिकाचे आगार समजले जाते. गेली काही वर्षे बेभरवशाचा पाऊस तसेच बाजारभावातील अनिश्चितता या कारणाने बटाटा लागवडीत घट होत चालली आहे.
सद्यःस्थितीत पावसाळी बटाटा काढणीला सुरुवात झाली आहे. परंतु उत्पादनात घट झाली आहे. त्यात भर म्हणून बाजारभाव ही नाही. त्यामुळे उत्पादकांना आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागणार आहे.
सुरुवातीच्या दोन महिने पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे कोरड्यात बटाटा लागवड करावी लागली. त्यानंतर अंतिम टप्प्यात अतिवृष्टी झाल्यामुळे बटाटा सडू लागला आहे. त्यामुळे उत्पादनात निम्याहून अधिक घट झाली आहे. तसेच बटाट्याला प्रती १० किलोला १२० ते १६० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे.
मागील वर्षी १० किलोला ३०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला होता. बाजारभाव कमी झाल्याने भांडवली खर्च देखील वसूल होत नसल्याने बटाटा पीक अंगावर आल्याने शासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच जयश्री तांबे, उपसरपंच बिपीन चौधरी, मनोज तांबे, मयूर सरडे, गणेश तांबे यांनी केली आहे.
दिवसेंदिवस पावसाचे घटते प्रमाण, बाजारभावाची अनिश्चितता, मजुरांची वाढलेली हजेरी या सर्व गोष्टींमुळे बटाटा पीक घेणे तोट्याचे ठरत असल्याची प्रतिक्रिया बटाटा उत्पादक शेतकरी निवृत्ती मिंडे, बाबाजी चौधरी, कांताराम तांबे, राघू रणपिसे, संभाजी सरडे यांनी व्यक्त केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.