
Nanded News : जिल्ह्यात प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजना २०२५-२०२६ मध्ये तीन लाख ८१ हजार ८१६ शेतकऱ्यांनी सात लाख २३ हजार ३९७ अर्ज दाखल केले आहेत. यात चार लाख ४९ हजार ८९० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी ४९ कोटी वीस लाखांचा विमा हप्ता कंपनीकडे भरला आहे. मागील वर्षी पाच लाख ६७ हजार ३३६ शेतकऱ्यांनी ११ लाख १३ हजार ६०९ अर्ज दाखल केले होते. यंदा तब्बल तीन लाख ९० हजार अर्ज कमी आले आहेत.
नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५-२०२६ मध्ये एआयसी कंपनीद्वारे राबविण्यात येत आहे. या योजनेतर्गत ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद व मुग यापिकासाठी पीकविमा भरण्याची सुविधा एक जुले पासून ते ३१ जुलैपर्यंत देण्यात आली होती. परंतु यात मुदतवाढ मात्र अद्याप देण्यात आली नाही.
यंदा शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी अंतिम तारखेची वाट न पाहत वेळेवर विमा भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले होते. परंतु शासनाने विमा योजनेतील बंद केलेले ट्रिगर तसेच एक रुपयात विमा योजनाही गुंडाळल्याने या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
३१ जुलैपर्यंत तीन लाख ८१ हजार ८१६ शेतकऱ्यांनी सात लाख २३ हजार ३९७ अर्ज दाखल केले आहेत. यात सहा पिकांसाठी चार लाख ४९ हजार ८९० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. यापोटी शेतकऱ्यांनी ४९ कोटी वीस लाखांचा विमा हप्ता कंपनीकडे भरला आहे.
मागीलवर्षी सात लाख ६७ हजार ८३० हेक्टर क्षेत्रासाठी पाच लाख ६७ हजार ३३६ शेतकऱ्यांनी ११ लाख १३ हजार ६०९ अर्ज दाखल केले होते. यंदा तब्बल तीन लाख ९० हजार अर्ज कमी आले आहेत.
तीन वर्षातील दाखल विमाअर्ज
वर्ष दाखल अर्ज
वर्ष २०२३-२४ ११ लाख ९८ हजार ९८०
वर्ष २०२४-२५ ११ लाख १३ हजार ६०९
वर्ष २०२५-२६ ०७ लाख २३ हजार ३९७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.