
Nanded News : खरीप हंगाम २०२४ मध्ये अतिवृष्टीनंतर विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी कंपनीकडे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकातर्गत भरपाईसाठी दावे दाखल केले होते. यात मंजूर ९० कोटी तसेच उत्पादन आधारित नुकसान भरपाई घटकातर्गत १० कोटी असे एकूण १०० कोटींचा परतावा अद्याप विमा कंपनीकडे थकला आहे. हा परतावा राज्यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनस्तरावरून एखादा कार्यक्रम आखण्याचे नियोजन सुरू असल्याचे माहिती सूत्राने दिली.
खरीप हंगाम २०२४ मधील सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मुग व ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत भरपाई मिळावी, यासाठी सहा लाख ३८ हजार अर्ज दाखल केले होते. यापैकी ३० टक्के सॅम्पल सर्व्हेनुसार विमाधारकांना (विस्तृत स्थानिक नैसर्गिक आपत्ती) ४१ कोटी ६५ लाखांचा विमा परतावा मंजूर झाला आहे.
तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकानुसार ९० कोटी व उत्पादन आधारित नुकसान भरपाई या घटकानुसार १० कोटी परतावा मंजूर झाला आहे. यात खरिपातील याबाबत विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी सहा लाख ३८ हजार दावे दाखल केले होते. परंतु या कालावधीत झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे न करता केवळ तीस टक्के सॅम्पल सर्वे करण्यात आले.
यानुसार जिल्ह्यातील सहा लाख ३८ हजार अर्जदार शेतकऱ्यांना केवळ ४१ कोटी ६५ लाखांचा परतावा मिळाला. दरम्यान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील अतिवृष्टीनंतर जिल्ह्यात पुन्हा पावसाने थेमान घातले.
यानंतर विमाधारक एक लाख पाच हजार अर्जदार शेतकऱ्यांनी दावे दाखल केले. यामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकातर्गत ९० कोटींचा विमा मंजूर झाल्याची माहिती मिळाली. उत्पादन आधारित नुकसान भरपाई या घटकातर्गत शेतकऱ्यांना १० कोटी ८५ लाखांचा विमा परतावा मंजूर झाला आहे.
जिल्ह्यात विस्तृत स्थानिक नैसर्गिक आपत्ती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती व उत्पादन आधारित नुकसान भरपाई या तीन घटकांनुसार १४० कोटींचा विमा परतावा मंजूर झाला आहे. तर यापूर्वी मीड सीजन ॲडव्हर्सिटी या घटकातर्गत २५८ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत.
शासन विमा वाटपासाठी इव्हेंटच्या तयारी
शेतकऱ्यांना विविध घटकांतर्गत मंजूर झालेल्या विम्याचे वितरण करण्यासाठी राज्य शासन एखादा कार्यक्रम घेण्याच्या तयारीत आहे. आमच्या सरकारमुळे तुम्हाला विमा मिळाला, असे यातून बिंबवण्याचा कार्यक्रम असल्याची माहिती पुढे येत आहे. परंतु विलंब होणाऱ्या परताव्यामुळे शेतकऱ्यांची मात्र कोंडी होत आहे.
विमा परताव्याची एकूण रक्कम...
एकूण मंजूर रक्कम : १०० कोटी
उत्पादन आधारित नुकसान भरपाई घटकांतर्गत : १० कोटी
उत्पादन आधारित नुकसान भरपाई घटकांतर्गत : १० कोटी
नुकसान स्थिती
अतिवृष्टीची तारीख: सप्टेंबर २०२४
नुकसानी झालेली पिके: सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मुग, ज्वारी
अर्ज आणि मंजुरी
अर्ज दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या: ६,३८,०००
मंजूर झालेल्या परताव्याची रक्कम: ४१.६५ कोटी (३०% सॅम्पल सर्वे नुसार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.