Mango Festival Latur : लातुरातील आंबा महोत्सव अखेर रद्द

Mango Farmers : मात्र काही दिवसांपासून सततचा पाऊस सुरू असल्याने आणि आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने जिल्हास्तरीय आंबा महोत्सव रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Mango Festival Latur
Mango Festival LaturAgrowon
Published on
Updated on

Latur : जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हास्तरीय आंबा महोत्सवाचे २३ व २४ मे रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर आयोजन करण्यात आले होते. मात्र काही दिवसांपासून सततचा पाऊस सुरू असल्याने आणि आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने जिल्हास्तरीय आंबा महोत्सव रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हंगाम संपल्यानंतर आंबा महोत्सवाच्या आयोजन केल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. यातच महोत्सवाचीही तारखा दोन वेळा बदलल्या गेल्या.

आंबा महोत्सव रद्द करण्यात आल्याच्या निर्णयाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव आणि आत्माचे प्रकल्प संचालक शिवसांब लाडके यांनी दुजारा दिला. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी कृषी विभागाच्या वतीने आधी १९ आणि २० मे व त्यानंतर तारखेत बदल करुन २३ व २४ मे रोजी जिल्हास्तरीय आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आंब्याचा हंगाम संपत आल्यानंतर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने महोत्सवाला आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत शंका उपस्थित होत असतानाच हंगाम तेजीत असल्याचे सांगत महोत्सवात केसर, बादाम, हापूस, अल्फान्सो, पायरी, लंगडा, तोतापुरी आदी दर्जेदार आंब्यांची विक्री होईल, असा दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी केला होता.

Mango Festival Latur
Latur Agriculture Department : लातूर येथे कृषी सहायक संघटनेचे धरणे

जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून पाच वर्षांत आंबा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. शेतकरी आंबा लागवडीतून शाश्‍वत उत्पादन घेण्यासाठी पुढे येत आहेत. जिल्ह्यात अक्षय तृतीयापासूनच बाजारात आंबे विक्रीसाठी येतात. शेतकरीही याच कालावधीत फळकाढणी होईल, या पद्धतीने आंबा फळबागांचे व्यवस्थापन करतात.

सध्याची स्थिती लक्षात घेता ७५ टक्के आंब्याची काढणी होऊन विक्रीही झाली आहे. २५ टक्के आंबे राहिल्याची शक्यता आहे. काही शेतकरी कल्टरचा उपयोग करुन उशिराने आंबा फळधारणेत येईल, याचे नियोजन करतात. अशाच शेतकऱ्यांकडे आंबा शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच दहा दिवसापासून जिल्ह्यात पाऊस सुरु झाला आणि आंब्याचा हंगाम संपल्यात जमा झाला. यामुळे हा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com