
Ratnagiri News : कोकणातील तरुण आंबा बागायतदार दलालांना आंबे न देता स्वतः आंब्याचे मार्केटिंग करीत आहेत. अनेक शेतकरी थेट मुंबई, पुणे, ठाणे येथे घरपोच आंबा विक्री करतात. मात्र महामार्गावर आणि मोठ्या शहरांमध्ये वाहतूक पोलिसांकडून आंबा वाहतूक करणाऱ्यांना त्रास दिला जातो. यावर तोडगा काढावा अशी मागणी शिवस्वराज्य आंबा बागायतदार संघटनेतर्फे संजय यादवराव यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून आंबा वाहतूक करणाऱ्या एमएच ०७ आणि एमएच ०८ क्रमांकाच्या गाड्या पाहिल्यानंतर मुंबई, पुण्यासह नव्या मुंबईतील वाशीबाजार परिसर आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पोलिस यांच्याकडून आंबा वाहतूकदारांना आणि शेतकऱ्यांना वारंवार थांबविण्यात येते. याचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे. हापूस आंबा म्हणजे श्रीमंत उत्पादन असा विचार केला जात असल्याने वाहतुकदारांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
ज्या पद्धतीने भाजीपाला शेतकऱ्यांना मदतीचे धोरण सरकारकडून घेतले जाते, त्या स्वरूपाचे धोरण आंबा बागायतदारांसाठीही पोलिसांनी घेतले पाहिजे. शेतकरी या नात्याने पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून जास्तीत जास्त सहकार्य मिळायला पाहिजे. काही चुका झाल्या तर दंड करून अन्यथा ताकीद देऊन सोडले पाहिजे.
शहरांमधील वाहतुकीचे सगळेच नियम ग्रामीण भागातील चालकांना किंवा शेतकऱ्यांना माहीत नसतात. आंबा वाहतुकीसाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष सहकार्य मिळणे आवश्यक आहे.
याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम निश्चितच तोडगा काढतील अशी अपेक्षा यादवराव यांनी व्यक्त केली आहे. निवदेन दिल्यानंतर मंत्री श्री. कदम यांनी कोकणातील बागायतदारांची ही समस्या समजून घेतली आणि त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे मान्य केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.