
Baramati News: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला थकबाकी चुकत नाही ती भरावीच लागते. अशा कायमस्वरुपी बंद असलेल्या बिगरशेती ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना सुरू आहे. योजनेची मुदत ३१ मार्चला संपणार आहे. तत्पूर्वी पात्र ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
बारामती परिमंडलात २ लाख ७७ हजार ४७२ ग्राहक अभय योजनेसाठी पात्र होते. यामध्ये बारामती मंडलात ६७ हजार २९३, सातारा ५४ हजार ८९६ व सोलापूर जिल्ह्यात १ लाख ५५ हजार २५० ग्राहकांचा समावेश आहे. मात्र यातील बारामती मंडलात ३३२४, सातारा मंडल १८९३ व सोलापूर मंडलातील ५५९८ ग्राहकांनी आतापर्यंत अभय योजनेचा लाभ घेत अनुक्रमे ३ कोटी ६० लाख,
२ कोटी ३५ लाख व ४ कोटी ६८ लाख असा १० कोटी ६५ लाखांचा भरणा केला आहे. लाभार्थी पैकी ४२०४ ग्राहकांची पुनर्जोडणी केली. तर २९७९ ग्राहकांनी नव्याने वीज जोडणी घेतली. अभय योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपमध्ये सुविधा उपलब्ध केली आहे. ऑनलाईन शक्य नसल्यास अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.