
Ahilyanagar News : अभय योजनेच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ३ हजार ९१७ वीज ग्राहकांनी ५ कोटी ३८ लाख रुपयाचा भरणा करून थकबाकीतून कायमची मुक्ती मिळविली आहे. हे नवीन वीज जोडणी मिळण्यासाठी पात्र झाले आहेत.
योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केलेल्या उर्वरित वीज ग्राहकांचे काम प्रगतिपथावर आहे. या योजनेचा लाभ ३१ मार्च २०२५ पर्यंत थकबाकी भरून घेता येणार आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या अहिल्यानगर मंडळाकडून करण्यात आले आहे.
महावितरणने वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या थकीत वीज बिल ग्राहकांसाठी अभय योजना सुरु केली. अभय योजना २०२४ नुसार थकबाकी एकरकमी भरल्यास थकबाकी वरील व्याज आणि विलंब आकारात सूट देण्यात येत आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे.
थकीत बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. या योजनेत वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील दंड माफ करण्यात येणार आहे.
वीजबिलाचा वाद न्यायप्रविष्ट असलेल्या ग्राहकांनाही या योजनेचा काही अटी, शर्तीवर लाभ घेता येईल. मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रक्कमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल.
थकबाकीमुक्त झालेले ग्राहक (कंसात जमा केलेली रक्कम)
अहिल्यानगर ग्रामीण ७७३ (४४.१६ लाख)
अहिल्यानगर शहर ८०६ (२ कोटी ३२ लाख)
कर्जत ८२७ (१ कोटी २१ लाख)
संगमनेर ७४२ (८९.६२ लाख)
श्रीरामपूर ७६९ (९५०.६५ लाख)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.