
Nagpur News: राज्यात रेशीम शेतीला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. यातूनच राज्यासाठी निर्धारीत चार हजार ४२० टन कोश उत्पादन उद्दिष्टापैकी फेब्रुवारी महिन्यापर्यंतच ९० टक्के उद्दिष्टपूर्ती गाठण्यात रेशीम संचालनालयाला यश आले आहे.
‘जो लावील तुतीची काडी तो शेतकरी नक्कीच बांधेल दुमजली माडी’ यासह अनेक स्लोगनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचे काम नागपुरातील रेशीम संचालनालयाच्या माध्यमातून होत आहे. शेतकऱ्यांसाठी देखील हे पीक नजीकच्या काळात नगदी पीक ठरले आहे. त्यामुळेच राज्यात रेशीम शेतीसाठी आवश्यक तुती लागवड क्षेत्रातही लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.
यंदाच्या हंगामात सुमारे २० हजार ७१० एकरांवर तुती लागवड होती. या शेतकऱ्यांनी सुमारे ६० लाख अंडीपुंजाची वापर करून रेशीम कोश उत्पादन केले. त्यातूनच राज्याकरिता निर्धारीत चार हजार ४२० टन कोश उत्पादकतेचा पल्ला अवघ्या काही दिवसातच गाठता येणार आहे. सध्या उद्दिष्टापैकी सुमारे ९० टक्के कोश उत्पादनाचा उद्देश साधता आला आहे. राज्यात रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील १९ हजार २१४ वर पोहोचली आहे.
शेतकऱ्यांना अंडीपुंज राज्यातच उपलब्ध व्हावे याकरिता छत्रपती संभाजीनगर येथे अंडीपुंज निर्मिती केंद्राची उभारणी होत आहे. महिको या खासगी कंपनीने त्यांचे अंडीपुंज निर्मिती केंद्र उभारले आहे. त्यातून देखील शेतकऱ्यांना अंडीपुंजाची उपलब्धता होत आहे.
ही कंपनी सध्या सीड कोश खरेदी करून अंडीपूंज विक्री करते, असेही रेशीम संचालनालयाकडून सांगण्यात आले. रेशीम संचालनालयाकरिता ३११ कर्मचारी संख्याबळ असून त्यातील केवळ १४० कर्मचारीच कार्यरत आहेत. मोठ्या संख्येने रिक्तपदे असताना देखील संचालनालयाने मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.