
Washim News : पाण्याच्या संकटावर मात करून जलसंपत्तीचा शाश्वत विकास साधण्यासाठी राज्य शासन विविध योजना राबवत आहे. जलसंवर्धन, सिंचन आणि जलयुक्त शिवार यांसारख्या उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाशीम जिल्ह्याचा दौरा करून जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. राज्याचे जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे पाटील हे रविवारी (ता. आठ) वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांचा, जलसंधारण योजनांची अंमलबजावणी, पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला.
मंत्री विखे पाटील म्हणाले, की जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबवून जिल्ह्याचा विकास साधण्याची जबाबदारी सर्वांची आहे. या बैठकीस आ. श्याम खोडे, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, डीपीओ राजेश सोनखासकर, कार्यकारी अभियंता शुभम जोशी, मृदू व जलसंधारण कार्यकारी अभियंता श्याम फेरवाणी, जलसंपदा कार्यकारी अभियंता संजय जेवलीकर, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.