
Sangli News : रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १४७० खत व कीटकनाशके विक्री दुकानांची जिल्हा कृषी विभागातर्फे तपासणी करण्यात आली होती. त्यातील २९ दुकानांमध्ये त्रुटी आढळल्या असून त्यातील आठ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
खत व कीटकनाशके निर्मात्या ५० कंपन्यांच्या तपासणीत तीन कंपन्यांत गंभीर दोष आढळले असून त्यांच्या परवाना निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली. रब्बी हंगामात खत आणि कीटकनाशकांचा तुटवडा निर्माण केला जातो. काही खतांमध्ये भेसळ केली आहे. बनावट खते तयार केली जातात. औषधांमध्ये बनावटगिरी केली जाते.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कीटकनाशके व खत विकणाऱ्या दुकानांची तपासणी मोहीम राबवली होती. त्यांत १४७० दुकानांची तपासणी करण्यात आली.
त्यांतील २९ दुकानांमध्ये साठा व अन्य बाबतीत दोष आढळून आले. गंभीर दोष असणाऱ्या आठ दुकानांचा परवाना निलंबित करण्यात आला. त्याच वेळी जिल्ह्यातील १०१ पैकी ५० कीटकनाशके व खत निर्मात्या कंपन्यांची तपासणी करण्यात आली. पैकी तीन कंपन्यांमध्ये दोष आढळून आले असून त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यात ७१ दुकानांची व १३ कंपन्यांची तपासणी करून अनियमिततेबाबत नोटीस देण्यात आल्या आहेत. परवाना रद्दसाठी तीन प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. कृषी सेवा केंद्राचे १३ परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
दुकानांची व उत्पादन स्थळांची १०० टक्के तपासणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात बी-बियाणे आणि खतांचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. शेतकऱ्यांनी त्याची गुणवत्ता आणि वजन तपासून खरेदी करावी. त्याबाबत शंका असतील तर थेट तक्रार करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.