
Sindhudurg News : पावसाअभावी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातरोप पुनर्लागवड रखडली असून हवामान विभागाने २४ जुलैपर्यत हलक्या पावसाचा अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. जिल्ह्यात अजूनही ३७ हजार हेक्टरवरील पुनर्लागवड शिल्लक आहे.
जिल्ह्यात सध्या भातरोप पुनर्लागवडीची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. जिल्ह्यात साधारणपणे ५७ हजार हेक्टरवर भातरोप पुनर्लागवड होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. दरम्यान यावर्षी मे महिन्यातच जोरदार पाऊस झाला. मॉन्सूनचे आगमन २५ मे रोजी झाले. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात भातरोप वाटीकांची कामे पूर्ण झाली.
१५ ते २० जूनपासून रोप पुनर्लागवडीला सुरूवात झाली. सुरवातीचे काही दिवस दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना भातरोप पुनर्लागवडीला गती मिळाली.मात्र त्यानतंर पावसाचा जोर कमी झाला. १ जुलैनतंर पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता नसलेल्या ठिकाणची लागवड रखडली आहे.
आतापर्यंत केवळ २० हजार हेक्टरवरील भातरोप पुनर्लागवड पूर्ण झाली आहे. अजूनही ३७ हजार हेक्टरवरील पुनर्लागवड शिल्लक आहे.पावसाअभावी गेल्या काही दिवसांपासून भातरोप पुनर्लागवडीची कामे पूर्णतः रखडली असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
परंतु हवामान विभागाने पुढील दोन आठवड्याचा पावसाचा अंदाज दिला आहे. १० जुलै ते २४ जुलै या कालावधीत केवळ १० ते २० मि.मी पावसाचा अंदाज आहे. हा नवा अंदाज सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा आहे. २४ जुलैपर्यत हलका पाऊस झाला तर पाणथळ जमीनी वगळता अन्य क्षेत्रावरील भातरोप पुनर्लागवड रखडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.