
Ratnagiri News : पाण्याअभावी जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पीक क्षेत्र कमी आहे. तृणधान्य, कडधान्य, भाजीपाला, गळीतधान्य मिळून एकूणच लागवड पाच हजार ११४.४२ हेक्टर क्षेत्रावर आहे.
खरिपातील भात कापणीनंतर जमिनीच्या अंगभूत ओलाव्यावर कुळीथ पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. ८८२.६९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे जमिनीतील ओलावा चांगला टिकून राहिल्याने पीक चांगले आले आहे.
किलोला ७० ते ८० रुपये दर मिळत असला तरी यावर्षी १०० रुपये दर मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कुळीथ पीक तयार झाल्यामुळे काढणी सर्वत्र जोरात सुरू आहे. सकाळी किंवा सायंकाळीच कुळीथ काढावा लागतो अन्यथा उन्हात शेंगा फुटण्याचा धोका असतो. एकाचवेळी पीक तयार झाल्याने मजूर मिळनासे झाले आहेत.
भातकापणी केल्यानंतर जमिनीतील ओलाव्यावर कुळीथाची पेरणी केली जाते. साडेतीन महिन्यांत पीक तयार होते. या पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता भासत नाही. शिवाय विशेष परिश्रमही लागत नसल्यामुळे सर्रास कुळीथ लागवड शेतकरी करत आहेत.
सर्वत्र काढणीचे काम सुरू झाले आहे. पेरणीनंतर एक वेळ कोळपणी १५ ते २० दिवसांनी व आवश्यकता भासल्यास ४० दिवसांनी बेनणी करावी. त्यानंतर पिकाची वाढ दाट झाल्यामुळे तणांच्या वाढीस आळा बसतो या पिकासाठी लागवड, मशागतीचा खर्च कमी आहे. कुळीथ पिकाला किडी व रोगाचा विशेष प्रादुर्भाव होत नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.