Narali Purnima
Narali Purnima Agrowon

Narali Purnima : सण आयलाय गो नारली पुनवेचा!

Koli Community : जून महिन्यापासून समुद्रातील मासेमारी बंद असते. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला अधिकृत सुरुवात होते. यानिमित्त येथील मच्छीमारांनी आपल्या बोटी सजवल्या आहेत, त्यांची रंगरंगोटी आणि दुरुस्ती केली आहे.
Published on

Raigad News : जिल्ह्याला तब्बल २४० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. येथील आगरी-कोळी समाजबांधव या दर्याचे खरे राजे आहेत. त्यामुळे येथे नारळी पौर्णिमेचा सण खूप महत्त्वाचा असून, श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. दर्याला नारळ अर्पण करून गोडधोड करून पारंपरिक वेशात कोळीबांधव मोठ्या उत्साहात सण साजरा करतात. धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून हा सण महत्त्वाचा आहे.

जून महिन्यापासून समुद्रातील मासेमारी बंद असते. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला अधिकृत सुरुवात होते. यानिमित्त येथील मच्छीमारांनी आपल्या बोटी सजवल्या आहेत, त्यांची रंगरंगोटी आणि दुरुस्ती केली आहे. तसेच पताका आणि झेंडेदेखील लावले आहेत. या दिवशी समुद्रदेवतेची पूजा केली जाते. नारळाला पवित्र मानून तो समुद्राला अर्पण केला जातो. नारळ अर्पण केल्याने समुद्र शांत राहील आणि मच्छीमार सुरक्षित राहतील, अशी श्रद्धा आहे.

Narali Purnima
Fishing Season : नव्या हंगामातील मासेमारीची तयारी

त्यानंतर समुद्रात मोठ्या प्रमाणात मासेमारीला सुरुवात होते. याशिवाय, नारळी पौर्णिमेला राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधनही येते. त्यामुळे रक्षाबंधनदेखील मोठ्या उत्साहात साजरा होतो. बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.

Narali Purnima
Fish Conservation : सिल्व्हर पापलेटचे जतन ‘ऐरणी’वर

मच्छीमार समुद्रावर अवलंबून आहेत आणि समुद्र त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच समुद्राच्या देवतेला संतुष्ट ठेवण्यासाठी या दिवशी विविध धार्मिक विधी केले जातात. नारळाचे विशेष महत्त्व आहे. कारण ते समुद्राला अर्पण करणे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. येथील मासे शहरात व इतर राज्यातही विक्री केले जातात.

समुद्रदेवतेची पूजा, नारळफोडीचा खेळ

नारळाला पवित्र आणि शुभ मानले जाते. अशी श्रद्धा आहे की, नारळ अर्पण केल्याने समुद्राच्या लाटा शांत राहतील आणि मच्छीमारांना सुरक्षितता मिळेल. ही पूजा मासेमारीचा हंगाम सुरक्षित आणि भरभराटीचा होईल, अशी आशा धरून केली जाते.

या सणानंतर मच्छीमार मासेमारीचा हंगाम सुरू करतात. तसेच या वेळी नारळ फोडाफोडीचा खेळदेखील खेळला जातो. हा खेळ सर्वांनाच मजा आणतो. अनेक लोक हा खेळ पाहण्यासाठी समुद्रकिनारी गर्दी करतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com