
Washim News : वाशीम जिल्हा प्रशासनाने जलसंधारणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या संकल्पनेतून साकार झालेला ‘जलतारा’ हा ड्रीम प्रोजेक्ट आता ‘वत्सगुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा २०२५’ या नावाने प्रेरणादायी उपक्रमात परिवर्तित झाला आहे.
‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ या तत्त्वावर आधारित असलेली ही स्पर्धा जागरूकता निर्माण करीत असून, वाशीम जिल्हा संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श म्हणून पुढे येत आहे. या स्पर्धेअंतर्गत वाशीम जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील २४ गावे पात्र ठरविण्यात आली होती.
शनिवारी (ता.१४) या गावांचे ग्रामपातळीवर प्रत्यक्ष परीक्षण करण्यात आले. या परीक्षणासाठी अकोला आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ५५ तज्ज्ञांचे ११ पथक तयार करण्यात आले होते. परीक्षणाचे संपूर्ण व्यवस्थापन तिफन फाउंडेशन यांच्याकडे होते.
पथकांचे स्वागत उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, आर्ट ऑफ लिव्हिंग अध्यक्ष डॉ. हरिश बाहेती आणि जलमित्र सुभाष नानोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, सर्व कृषी अधिकारी उपस्थित होते.
परीक्षणासाठी विजय सरोदे (मेहकर), श्रीनिवास शिंदे (वसमत), के. एम. जाधव (नांदेड), विठ्ठल धांडे (मेहकर), विनोद सुसर (बुलडाणा), धनंजय वार्डेकर (नाशिक), आनंद बथकल (आर्णी), रवींद्र जटाळे (नेर), विलास वाशीमकर (अकोला), अनंत देशमुख (अकोट) व मिलिंद वानखेडे (अमरावती) यांनी कामकाज पाहले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.