Mahavitran Kolhapur : महावितरणच्या वेळकाढूपणामुळे कोल्हापुरातील ३ शेतकऱ्यांचा मृत्यू, इरिगेशन फेडरेशन आक्रमक

Irrigation Federation : शेतकऱ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी महावितरणने तत्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा इरिगेशन फेडरेशनकडून देण्यात आला.
Mahavitran Kolhapur
Mahavitran Kolhapuragrowon
Published on
Updated on

Kolhapur Mahavitran : कोल्हापूर जिल्ह्यात वीजेच्या तारांचा स्पर्श होऊन मागच्या ८ दिवसांत शाहूवाडी तालुक्यातील दोन तर करवीर तालुक्यातील तरूण शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. दरम्यान याला जबाबदार महावितरणचा वेळकाढूपणा असल्याचा आरोप इरिगेशन फेडरेशनने केला. तसेच शेतकऱ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी महावितरणने तत्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. महावितरण ताराबाई पार्क येथील मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांना काल (दि.०९) निवेदन देण्यात आले.

इरिगेशनचे अध्यक्ष माजी आमदार संजय घाटगे व विक्रांत पाटील यांच्यासह शिष्ठमंडळाने काटकर व अधीक्षक अभियंता जी. एम. लटपटे यांनी येथे जबाबदारीच्या पदांची सूत्रे स्वीकारली याबद्दल स्वागत व अभिनंदन केले.

महावितरणकडून वेळेत विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती देखभाल केली नसल्यामुळे गेल्या आठवड्यात जिल्ह्यामध्ये उमद्या व तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. याला केवळ महावितरणचा कारभारच कारणीभूत आहे. वाहिन्यांच्या अचानक तारा तुटल्यामुळे शेतकऱ्यांना शेताकडे जाणे जोखमीचे झाले आहे.

महावितरणकडून विद्युत तारांचा झोळ वेळेत न काढणे किंवा दुरुस्ती न करणे तसेच विद्युत खांबावरील विद्युत कंडक्टरची दुरुस्ती न करणे या आदी कारणाने तारा तुटून जी घेणे अपघात होत आहेत. अशा घटनामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील विद्युत वाहका तारांची पहाणी करुन तात्काळ दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा शिष्‍ठमंडळाने व्यक्त केली.

Mahavitran Kolhapur
Kolhapur Rain Update : कोल्हापुरातील २८ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला

तार तुटली तरी ती खाली पडणार नाही म्हणून सर्व वीजवाहक तारांना तात्काळ पेसर बसवावेत. वीजेच्या तारांचा झोळ काढून घ्यावेत. मृत शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी भारत पाटील-भुयेकर, आंबरिषसिंह घाटगे, चंद्रकांत पाटील-पाडळीकर, बाबासाहेब देवकर, राजेंद्र सूर्यवंशी, आत्माराम चौगुले, सचिव मारुती पाटील आदी उपस्थित होते.

कार्यवाही न झाल्यास आंदोलनचा इशारा

शेतामध्ये जाताना खबरदारी घ्यावी, तुटलेल्या तारेला स्पर्श करू नये, पायात रबरी बूट किंवा चप्पल घालावे, सतर्क राहून शेती कामे करावीत असे आवाहन केले. महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन देखभाल दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

याबाबत महावितरणकडून योग्य ती कार्यवाही झाली नाही आणि पुन्हा दुर्घटना घडल्यास इरिगेशन फेडरेशनच्या वतीने तीव्र आंदोलन करु असा इशारा महावितरणला दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com