Maharashtra Rain : औसा तालुक्यात पावसाचा असमतोल

Rain Alert : औसा तालुका परिसरात पावसाच्या असमतोलपणामुळे काही ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने पेरणी खोळंबली आहे, तर बहुतांशी भागांत पिकाचे आयुष्य तुरळक पावसावर अवलंबून आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Ausa News : औसा तालुका परिसरात पावसाच्या असमतोलपणामुळे काही ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने पेरणी खोळंबली आहे, तर बहुतांशी भागांत पिकाचे आयुष्य तुरळक पावसावर अवलंबून आहे. पिकांच्या ऐन फुलोऱ्याच्या हंगामात कमी-जास्त पावसामुळे मालाच्या उताऱ्यावर परिणाम होण्याचा अंदाज आहे.

बऱ्याच वर्षांनंतर तालुका परिसरातील शेतकऱ्यांना मृगाची पेर सापडली. यामुळे मागील पाच-सात वर्षांपासून घटलेले उडीद, मुगाची पेर सापडली. या नक्षत्रातील पेरणीमुळे पिके रोगराईत सापडत नाहीत. मालाचा उतारा चांगला मिळतो. पुढील रब्बीची पेर वेळेवर होते. वर्षातून दुहेरी उत्पादनाचा लाभ मिळतो. कीटकनाशके, बुरशीनाशके याचा खर्च वाचतो. मृग नक्षत्राच्या दमदार पावसानंतर पावसाने अनियमितता सुरू केली.

Rain Update
Maharashtra Rain Alert : राज्यात दमदार पावसाची शक्यता

तालुक्यातील पश्चिम-उत्तर भागातील औसा, आलमला, तावरजा नदीकाठचा परिसर शिवाय उजनीकडील नदीकाठचा परिसर अशा काही मोजक्या ठिकाणी दोन-तीन मोठे पाऊस झाल्याने त्या भागातील बांधाजवळील जमिनीमधील पाण्याचा निचरा न झाल्याने पेरण्या झाल्या नाहीत. पश्चिम-दक्षिण भागातील नागरसोगा, दापेगाव जवळगा (पो.) लिंबाळा, गुबाळ या परिसरात तुरळक पावसामुळे पिके तग धरून आहेत.

शिवनी, शिवनी वाडी, लामजना, कारला, मोगरगा, तांबरवाडी या परिसरात विहिरीला बोअरला पाणी असलेले काही शेतकरी ठिबक सिंचनाचे पाणी देत आहेत. या पावसामुळे विहिर-बोअरवेलला पाणी वाढले नाही. जायफळ, आंदोरा, भेटा, वडजी या परिसरात पावसाअभावी पिकाखालील जमिनीला भेगा पडत आहेत.

Rain Update
Rain Update : राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी

दमदार पावसाची गरज

याकरिता दमदार पावसाची गरज असल्याचे लिंबाळादाऊचे शेतकरी शौकत मिया, मोगरग्याचे किरण सोनवणे, नागरसोगाचे रमेश शिंदे, तावशीचे (ताड) संजय पवार, आलमलाचे रविशंकर बिराजदार, एरंडीचे शामराव जाधव यांनी सांगितले.

मालाच्या उताऱ्यावर परिणाम होणार

तालुक्यातील १३० गाव शिवारातील परिस्थिती कमी अधिक प्रमाणात सारखी आहे. अनेक ठिकाणी कोळपणी, खुरपणी, फवारण्या झाल्या आहे. मात्र, हा काळ फुले लागण्याचा आहे. या अवस्थेत जास्त पाणी झाले, तर पिके पिवळी पडतात. तसेच, कमी पाणी झाले तर पिकाची वाढ खुंटून फुले गळतात. त्यामुळे उताऱ्यावर परिणाम होतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com