Farmer Loan Waiver: ट्रिपल इंजिन सरकारमध्ये पत असेल, तर शेतकऱ्यांसाठी पॅकेज आणा: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

Maharashtra Politics: राज्य सरकारने कर्जमाफी आणि महिलांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते, पण आता भूमिका बदलत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला जाब विचारत केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज आणण्याचे आव्हान दिले.
Congress State President Harshvardhan Sapkal
Congress State President Harshvardhan SapkalAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे जाहीर आश्वासन महायुतीने दिले होते. पण आता त्यांची भाषा बदलली असून ३१ मार्चपूर्वी कर्ज भरण्याचे फर्मान काढले जाते, हा प्रकार राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा गजनी झाल्याचा प्रकार आहे. पण पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर त्यांनी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज आणावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी (ता. २) दिले.

Congress State President Harshvardhan Sapkal
Maharashtra Politics: विधान परिषदेत गदारोळ! निलम गोऱ्हेंच्या विश्वासदर्शक ठरावावरून विरोधक आक्रमक

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणताही महत्त्वाचा निर्णय न घेताच गुंडाळले. मोठी मोठी भाषणे केली. पण त्यांना त्यांच्याच जाहीरनाम्याचा विसर पडला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात नटसम्राट शिरला होता. पण ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’, असेच अधिवेशनाचे वर्णन करावे लागेल.

Congress State President Harshvardhan Sapkal
Farmer Loan Waiver: कर्जमाफीबाबत सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात

जनतेचे मूलभूत प्रश्न सोडून औरंगजेबाची कबर उकरून काढण्यात आली. बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला भाव याचा विसर महायुती सरकारला पडला आहे. सरकारने जाणीवपूर्वक मुद्द्यांना बगल दिली. तसेच खडकपूर्णा डाव्या कालव्याच्या पाण्यासाठी फडणवीस मुख्यमंत्री असताना स्थानिक आमदाराला वाढदिवसाची भेट म्हणत त्यांनी सही करत सुप्रमा दिली होती. पण आता ते होऊ शकत नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

याच पाण्याच्या प्रश्नावरून तरुण शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली. त्यामुळे, ‘क्या हुआ तेरा वादा?’ अशी विचारणा जनता करत आहे’’ ‘नरेंद्र मोदी यांची खुर्ची डळमळीत’ पंतप्रधान मोदी यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘मोदी यांनी ११ वर्षांनंतर ३० मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील मुख्यालयाला भेट दिली. आपली खुर्ची धोक्यात आल्यामुळेच मोदी यांना आरएसएसची आठवण आली असावी,’’ असेही सपकाळ म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com