Parbhani News : परभणी जिल्ह्यात कृषी आधारित उद्योगांच्या भरपूर संधी आहेत. परंतु उद्योग उभारणीसाठी आवश्यक तेवढी जमीन उपलब्ध नाही. विविध विभागांकडून परवानगी देण्यास विलंब लावला जातो. बँक कर्जपुरवठ्यास राजी होत नाहीत हे अडसर दूर झाले तर जिल्ह्यातील उद्योग उभारणीस गती मिळेल.
गुंतवणूक करण्यासाठी मोठे उद्योजक पुढे येतील. नवउद्योजक तयार होतील. त्यादृष्टीने प्रकल्प आराखडा तयार करावा लागेल, असा सूर मंगळवारी (ता. ५) परभणी येथे आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत आळविण्यात आला.
या वेळी नवीन ४१ उद्योजकांशी सामंजस्य करार करण्यात आले असून त्याद्वारे ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. उद्योग संचालनालय व जिल्हा उद्योग केंद्र यांच्यातर्फे परभणी येथे आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेस उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल बळे,
जिल्हा जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश डागा, लघू उद्योग संघटनेचे सचिव प्रमोद वाकोडकर, सेलू येथील केशवराज कॉटन क्लस्टर रामेश्वर राठी, उद्योग संचालनालयातील मैत्री कक्षाचे उमेश पाटील, सनदी लेखापाल शाम धूत, एस. एच. पवार आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात अनिल बळे म्हणाले, की क्लस्टर समूह योजनेतून कापूस चाचणी यंत्राचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये प्रस्थापित होणाऱ्या नवीन ४१ उद्योग घटकांशी सामंजस्य करार करण्यात आले. त्यामधून जिल्ह्यामध्ये ४०० कोटी रुपये गुंतवणूक होणे अपेक्षित आहे.
हे उद्योग सुरू झाल्यानंतर सुमारे १ हजार २०० व्यक्तींना रोजगार उपलब्ध होईल. शेवाळे म्हणाले, की उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्न केले जातील.
गुंतवणूक वाढली तर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. रोजगार निर्माण होईल. डागा म्हणाले, की सुपीक जमिनीचे क्षेत्र मोठे आहे. कापूस, सोयाबीन तसेच विविध फळांचे उत्पादन घेतले जाते.
त्यामुळे कृषी प्रक्रिया उद्योगासाठी मोठ्या संधी आहेत. परभणी, सेलू येथील औद्योगिक वसाहतीची प्रकरणे प्रलंबित आहेत. एक खिडकीद्वारे उद्योग उभारणी परवान्याची प्रक्रिया सुलभ करावी.
सचिव वाकोडकर म्हणाले, की परभणी जिल्ह्यात तीनही हंगामात येणाऱ्या ज्वारीपासून इथेनॉल निर्मिती उद्योग उभारता येतील. रेशीम, मध उत्पादन उद्योगात गुंतवणूक करता येईल. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करावा लागेल. पाटील म्हणाले, की मैत्री कक्षाच्या माध्यमातून उद्योजकांच्या अडचप्रवेशित: णी सोडविल्या जातात.
धूत म्हणाले, की सूक्ष्म व मध्यम उद्योगाच्या उभारणीतून जिल्ह्याची प्रग पुनर्लेखन: प्रश्नांचे उत्तरे दिली जातात. धूत यांनी सांगितले की, लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगांच्या विकासामुळे जिल्ह्याचा अर्थिक विकास होईल.ती होईल. तृणधान्ये प्रक्रिया, जैवइंधन निर्मिती, तांत्रिक कापड उत्पादन, वेस्ट मॅनेजमेंट आदी नवीन उद्योग आहेत.
कोण कोण होते उपस्थित...
या परिषदेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मैत्री कक्ष, उद्योग संचालनालय, मुंबई सीडबी बँक, जिल्ह्यातील बँका, उद्योजक संघटना, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन, कौशल्य विकास व रोजगार व जिल्ह्यातील संबंधित शासकीय यंत्रणांचे प्रमुख,
उद्योजक संघटना, उद्योजक, शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी, नव उद्योजक उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत सुरू केलेल्या औद्योगिक उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.